suvichar

राज्यात १,९२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:40 IST)
राज्यात मंगळवारी १,९२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,३०,२७४ झाली आहे. राज्यात ४१,५८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,१३९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७, अहमदनगर ३, नंदूरबार ४, पुणे २, सोलापूर २, नागपूर ३, चंद्रपूर ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३० मृत्यूंपैकी १९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
 
तर ४,०११ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,३६,३०५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३७ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,४७,०६,९९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,३०,२७४ (१३.८० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,८९,२८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,१२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

१ ऑगस्टपासून ही शासकीय कागदपत्रे डिजिटल स्वाक्षरीशिवाय दिली जाणार नाहीत, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

7 इलेक्ट्रिक स्कूटर्स, कमी उंचीच्या लोकांनाही ट्रॅफिकमध्ये अडचण येणार नाही, यादी पहा

मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये 'एक रुग्ण, एक कुटुंबीय' नियम लागू होणार

LIVE: १ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरी चा वापर पूर्णपणे अनिवार्य, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

मुंबईतील उघड्या मॅनहोल अपघात रोखण्यासाठी बीएमसी मॅनहोल रेलगार्ड'ची चाचणी घेणार

पुढील लेख
Show comments