Marathi Biodata Maker

जाणून घ्या रामायणातील सुषेण वैद्य कोण होते...

अनिरुद्ध जोशी
सोमवार, 20 एप्रिल 2020 (13:16 IST)
वाल्मीकींच्या रामायणात रामाची जीवनगाथा आहे. राम आणि रावण यांच्यात युद्ध सुरू होत तेव्हा लंकापती रावणाचा मुलगा मेघनादच्या हल्ल्यामुळे लक्ष्मणाला शक्ती लागून लक्ष्मण बेशुद्ध पडतात. त्यावेळी लंका मधून तिथले वैद्य सुषेण वैद्य यांना बोलावले जाते. चला जाणून घेऊ या की हे सुषेण वैद्य कोण होते ते...?
 
लक्ष्मणाचे शुद्ध हरपणे  -  राम रावणाच्या युद्धाच्या वेळी मेघनादच्या बाणाने लक्ष्मणाची शुद्ध हरपली. लक्ष्मणाला अश्या अवस्थेत बघून सर्वजण काळजीत पडले आणि निराश होऊ लागले. हे बघून विभीषणाने सर्वांचे सांत्वन केले आणि त्यांना सुषेण वैद्याबद्दल सांगितले. सुग्रीवाने हनुमानाला सुषेण वैद्यांना आणायला सांगितले. सुशील वैद्यांनी लक्ष्मणाला तपासून संजीवनी बुटी आणावयास सांगितले. प्रत्येकाने संजीवनी बुटीच्या शोधात मारुतीला जायला सांगितले. मारुतीला संजीवनी बुटीची ओळख नसल्याने मारुतीने संजीवनीचा डोंगरच उचलून आणला. परत रावणाशी युद्ध करीत असताना लक्ष्मणाला शक्ती लागून ते बेशुद्ध पडतात. लक्ष्मणाला अश्या अवस्थेमध्ये बघून राम विलाप करू लागतात. सुषेण लक्ष्मणाची तपासणी करून सांगतात की लक्ष्मणाच्या तोंडावर मृत्यूचे सावट नाही. त्यामुळे आपणास काळजी नसावी.
 
सुषेण वैद्य कोण होते : सुषेण वैद्य हे वानरराज सुग्रीव ह्याचे सासरे होते. आधी हे लंकेचे राजा रावणाचे राज वैद्य असे. वानरराज सुग्रीवाचे थोरले भाऊ बाली यांची पत्नी तारा सुषेण वैद्य यांची धर्मकन्या होती. बालीच्या मृत्यू नंतर तारांचे लग्न सुग्रीवाशी करण्यात आले. बालीची एक बायको अजून होती तिचे नाव रुमा असे. तसेच अंगद हा बालीचा मुलगा होता.

सर्व पहा

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

Vat Purnima 2026 वट पौर्णिमा २०२६: पूजा, शुभ मुहूर्त, व्रत कथा आणि जाणून घ्या काय करावे-काय टाळावे

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

Muharram 2026: मोहरम का साजरा केला जातो? जाणून घ्या कर्बलाचा इतिहास आणि महत्त्व

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments