Festival Posters

मंदोदरीचे दोन पती होते, ही कथा ऐकून आपण थक्क व्हाल...

Updated: गुरूवार, 23 एप्रिल 2020 (16:54 IST)
 हनुमानाने मंदोदरी कडून हे बाण चोरले आणि रावणाला मारण्यासाठी रामाला दिले.
* सिंघलदीपची राजकन्या आणि एका मातृकेचे नाव देखील मंदोदरी होते. लोकांच्या मतानुसार मंदोदरीही मध्यप्रदेशातील मंदसोर राज्याची राजकन्या होती. असे मानले जाते की मंदोदरी राजस्थानमधील जोधपूर जवळील मंडोरची होती. 
 
मंदोदरीने रावणाशी लग्न केले -
असे म्हटले जाते की भगवान शिव यांच्या वरदानामुळेच मंदोदरीचे लग्न रावणाशी झाले होते. मंदोदरीने भगवान शंकराकडून वरदान मागितले की तिचा नवरा पृथ्वीवरील सर्वात विद्वान आणि शक्तिशाली असावा. मंदोदरीने मेरठच्या सदर भागात श्री बिल्वेश्ववर नाथ मंदिरात भगवान शिवाची पूजा केली येथेच रावण आणि मंदोदरी भेटले. रावणाला बऱ्याच राण्या होत्या पण लंकेची राणी फक्त मंदोदरीच मानली जात असे. 
 
मंदोदरीने विभीषणाशी लग्न का केले ?
मंदोदरीला तिच्या नवऱ्याने केलेल्या दुष्कृत्याची चांगलीच जाणीव होती. तिने रावणाला नेहमी वाईट मार्गाचा नाद सोडून सत्याच्या धरणात येण्याचा सल्ला दिला होता. परंतु आपल्या शक्तीचा अभिमान बाळगून रावणाने कधीच मंदोदरीने सांगितल्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. कधीही त्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. रावणाने सीतेला हरण करून आणल्यावरही मंदोदरीने त्याचा विरोध केला होता. आणि सीतेला परत रामाकडे पाठवून द्यायला सांगितले होते. पण रावणाने ऐकले नाही आणि परिणाम राम रावणाचा युद्ध झाला आणि केवळ विभीषणाला वगळता त्याचा संपूर्ण वंशाचा नायनाट झाला.
 
रावणाच्या मृत्यूनंतर फक्त रावणाच्या कुळाचे विभीषण आणि कुळातील काही निवडक बायकाच वाचल्या. युद्ध झाल्यावर मंदोदरी युद्धक्षेत्रामध्ये गेली आणि तिने तेथे तिचा पती, मुलगा आणि इतर नातेवाइकांचा मृतदेह बघून फार वाईट वाटले. मग तिने प्रभू श्रीरामाकडे बघितले जे अलौकिक दिसत होते. लंकेच्या सुखी भविष्यासाठी श्रीरामाने विभीषणाकडे लंकेचे राज्य दिले. विभीषणाच्या राज्याभिषेकानंतर प्रभू श्रीरामाने मंदोदरी समोर विभीषणाशी लग्न करण्याचा अत्यंत विनयशील प्रस्ताव मांडला आणि मंदोदरीला आठवण करून दिली की ती लंकेची राणी आणि अत्यंत शक्तिशाली रावणाची विधवा आहे. असे म्हणतात की त्यावेळी मंदोदरीने काहीच उत्तर दिले नाही. जेव्हा प्रभू श्रीराम आपल्या पत्नी आणि सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या समवेत अयोध्येला परत आले, तेव्हा मंदोदरीने मागील कारागृहात स्वतःला कैद केले आणि बाहेरील जगापासून सर्व संपर्क तोडून टाकले. पण काही काळानंतर आपल्या महालमधून बाहेर पडली आणि विभीषणाशी लग्न करण्यासाठी तयार झाली.
 
पण मंदोदरीच्या संदर्भात या गोष्टींवर विश्वास ठेवणे सहज नाही कारण मंदोदरी ही एक सती स्त्री होती. जी आपल्या पतीसाठी एकनिष्ठ होती, अश्या परिस्थितीत मंदोदरीने विभीषणाशी लग्न करणे ही एक धक्कादायक घटना आहे. तथापि रामायणात अश्या बऱ्याच विचित्र कथा आहेत. असे ही म्हटले जाते की काही समाजांमध्ये प्राचीनकाळी अशीच प्रथा होती. बालीला ठार मारल्यानंतर सुग्रीवाने त्याचा पत्नीशी लग्न केले होते.

सर्व पहा

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments