Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्तिक माहात्म्य - अध्याय २६

Updated: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:00 IST)
सूर्यास्तसमयीं त्रिपुरारि शंकराप्रीत्यर्थ दीपोत्सव करीत आहेत असें पाहिलें ॥१२॥
त्या कार्तिकमहिन्यांतील पौर्णिमातिथीला शंकरांनीं त्रिपुराला जाळिलें, म्हणून त्या दिवशीं भक्त मोठा दीपोस्तव करितात ॥१३॥
जो मजमध्यें व शंकरामध्यें भेद समजतो त्याची सर्व पुण्यकर्मे निष्फळ होतात ॥१४॥
याप्रमाणें सर्व पुण्यकर्मे चाललीं आहेत, असें पाहत पाहत तो धनेश्वर व्यापाराकरितां फिरत होता. इतक्यांत एक कृष्णसर्प त्याला चावला; तेव्हां तो विव्हळ होऊन पडला ॥१५॥
तो असा पडलेला पाहून दयाळु लोक त्याच्या भोंवतीं जमले व त्यांनीं तो सावध होण्याकरितां तुलसीमिश्रित पाणी त्याचे मुखावर शिंपडलें व तोंडांत घातलें. तोंच त्यानें प्राण सोडले ॥१६॥
त्यानें प्राण सोडतांच यमदूत त्याला रागानें बांधून चावकानें मारीत मारीत यमपुरी संयमिनीला नेते झाले ॥१७॥
चित्रगुप्त त्याला पाहतांच त्याची निर्भर्त्सना करुन, त्यानें बाळपणापासून केलेलीं सर्व पातकें यमाला सांगूं लागला ॥१८॥
चित्रगुप्त म्हणालाः-- हे यमा, यानें उपजल्यापासून कांहीं देखील पुण्य केलें नाहीं. यानें इतकी पापें केलीं आहेत कीं, तीं सांगण्याला एक वर्षही पुरणार नाहीं ॥१९॥
हा दुष्ट केवळ पापाची मूर्ति दिसत आहे, म्हणून कल्पांतापर्यंत यानें नरकांत तळमळत पडावें ॥२०॥
श्रीकृष्ण म्हणालेः-- याप्रमाणें चित्रगुप्ताचें भाषण ऐकून यम संतापला व आपले प्रलयकाळचें अग्नीप्रमाणें उग्ररुप प्रगट करुन दूताला म्हणाला ॥२१॥
यम म्हणतोः-- अरे, प्रेतपतींनो ! तुम्ही आपल्या मुद्गलांनी या दुष्ट पाप्याला मारीत मारीत कुंभीपाक नरकामध्यें टाकून द्या ॥२२॥
श्रीकृष्ण म्हणालेः-- त्या प्रेतपतींनीं मुद्गलानें त्याचें मस्तक फोडलें व ज्यामध्यें तेल कडकड कढत आहे अशा कुंभीपाकांत त्याला टाकिलें ॥२३॥
त्यास टाकतांच तो कुंभीपाक, जसा पूर्वी प्रल्हादाचे रक्षणाकरितां अग्नि थंड झाला तसा थंड झाला ॥२४॥
तो मोठा चमत्कार पाहून प्रेतपतींना विस्मय वाटला व त्यामुळें ते धांवत जाऊन यमाला सर्व हकीकत सांगूं लागले ॥२५॥
तें ऐकून यमानें प्रत्यक्ष जाऊन पाहिलें. तेव्हां त्याला चमत्कार वाटून, अहो ! हें काय आश्चर्य असें, बोलून त्या धनेश्वराला बोलावून विचारुं लागला ॥२६॥
इतक्यांत तेथें नारद आले, यमानें त्यांना पाहतांच त्यांची पूजा करुन त्यांना हें वर्तमान सांगितलें, तेव्हां त्या धनेश्वराला पाहून नारद म्हणाले ॥२७॥
नारद म्हणतातः-- हे अरुणनंदना, यमा हा नरक भोगण्याला योग्य नाहीं. कारण, याचे हातून शेवटीं नरकभोग चुकविण्याजोगें पुण्य घडलें आहे ॥२८॥
जो कोणी मनुष्य पुण्यकर्म करणारांचें दर्शन, स्पर्शन व त्यांशीं भाषण करील त्याला त्यांचे पुण्याचा सहावा भाग निश्चयानें मिळतो ॥२९॥
या धनेश्वरानें कार्तिकव्रत करणारांचें सख्य करुन एक महिना सहवास केला म्हणून त्यांचे पुण्याचा भाग याला मिळाला ॥३०॥
व त्यांची सेवा केली तिचें सर्व पुण्य याला मिळालें. म्हणून कार्तिकव्रतापासून किती पुण्य प्राप्त होतें त्याची गणती नाहीं ॥३१॥
कार्तिकव्रत करणारांचीं पातकें कितीही मोठीं असलीं तरी भक्तवत्सल विष्णु तीं सर्व नाहीशीं करितो ॥३२॥
म्हणून याचीं सर्व पापें गेलीं आहेत. वैष्णवांनीं याजवर अनुग्रह केला आहे; करितां हा नरक भोगण्यास योग्य नाहीं. याला सद्गतीच मिळाली पाहिजे ॥३४॥
आर्द्र व शुष्क पातकांनीं जसा नरक भोगावा लागतो, तसा पुण्यकर्मांनीं स्वर्ग प्राप्त होतो ॥३५॥
याजकरितां याचे हातून नकळत सहज पुण्य घडलें आहे, म्हणून हा हे सर्व पापामुळें भोगावे लागणारे नरक पाहून नंतर यक्षाचे योनींत राहील ॥३६॥
श्रीकृष्ण म्हणालेः-- याप्रमाणें बोलून नारद केल्यानंतर नारदाच्या भाषणानें त्या धनेश्वराचें पुण्यकर्म ज्याला समजलें आहे असा तो यम आपले दूतांकडून त्या धनेश्वराला नरकदर्शन करवून आणविता झाला ॥३७॥
इति श्रीकर्तिकमाहात्म्ये षङ्विंशतितमोध्यायः ॥२६॥

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख