Dharma Sangrah

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३४

Updated: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:07 IST)
जो कार्तिकांत तुळसीची माळा करुन तिनें विष्णूची पूजा करितो, त्याच्या पापांच्या अक्षरांची माळा कृष्ण खरोखर तोडून टाकून देतो ॥११॥
श्रीचंदन, कापूर अगरु व केशर यानीं मिश्रित गंध, केवडा, व दीपदान हीं केशवाला नेहमीं प्रिय आहेत ॥१२॥
कलियुगांत कार्तिक महिन्यामध्यें केवडा दिला, व दीपदान केलें तर हे कार्तिकेया ! त्याच्या शंभर कुलांचा उद्धार होतो ॥१३॥
कमळें, तुळसी, केवडा अगस्त्याचें फूल व पांचवें दीपदान हीं कार्तिकांत विष्णूला अर्पण करावीं ॥१४॥
हे वत्सा ! जो मालतीच्या मालांनीं कार्तिकांत केशवाचा मंडप सुशोभित करील, त्याला स्वर्गांत वस्ती प्राप्त होईल ॥१५॥
केवड्याच्या पुष्पांनी जर विष्णूची पूजा केली तर तो त्याला हजार वर्षेपर्यंत सुप्रसन्न होतो ॥१६॥
हे षडानना ! केवड्याच्या फुलांनीं विष्णूची पूजा केली असतां, त्या पुण्यानें तो मंगलकारक वैकुंठाला जातो ॥१७॥
चैत्र वैशाख, आला असतां दवण्यानें विष्णूची पूजा केली तर शंभर गाई दान दिल्याचें पुण्य मिळतें ॥१८॥
अगस्त्याच्या फुलांनीं विष्णूची पूजा केली तर त्याला पाहतांच नरकाग्नि थंड होतो ॥१९॥
अगस्त्याच्या फुलांनीं पूजा केली असतां जसा विष्णु संतुष्ट होऊन फल देतो, तसा तप करुन फल देत नाहीं ॥२०॥
कार्तिकांत सर्व फुलें सोडून अगस्त्यपुष्पांनींच केशवाची पूजा केली तर त्याला अश्वमेधाचें फल मिळतें ॥२१॥
अगस्त्यपुष्पांची माळा करुन जो विष्णूला अर्पण करितो, त्याची इंद्र देखील स्तुति करितो ॥२२॥
हजार गाई दान केल्यानें जें फळ मिळतें तें एक अगस्त्यपुष्प कार्तिकांत विष्णूला अर्पण केल्यानें मिळतें ॥२३॥
हरि जसा कौस्तुभमण्यानें किंवा वनमालेनें संतुष्ट होतो, तसाच कार्तिकांत तुलसीपत्रांनीं संतुष्ट होतो ॥२४॥
सूत म्हणालेः-- वृषध्वज शंकर, आपला पुत्र कार्तिकेय भक्तितत्पर होऊन विनयानें नम्र झाला आहे, असें पाहून पुन्हा बोलूं लागले ॥२५॥
ईश्वर म्हणालेः-- मयूरवाहना षडानना ! कार्तिकांतील दीपाचें माहात्म्य सांगतों; श्रवण कर ॥२६॥
पितर पितृगणांसह इच्छा करितात कीं, आमच्या कुलांत सत्पुत्र पितृभक्त, कार्तिकांत दीपदानानें केशवाला संतुष्ट करणारा असा होईल काय ? ॥२७॥ तुपानें किंवा तेलानें देवापुढें जो दिवे लावितो, त्याला अश्वमेध करुन काय करावयाचें ? ॥२८॥
कार्तिकामध्यें केशवापुढें ज्यानें दीपदान केलें त्यानें सर्व यज्ञ केलें. सर्व तीर्थांत स्नान केल्याप्रमाणें आहे ॥२९॥
विशेषेंकरुन कार्तिक कृष्णपक्षांतील शेवटचे दिवाळीचे पांच दिवस विशेष पुण्यकारक आहेत. त्या पांच दिवशीं जो दीपदान करील त्याला अक्षय्य पुण्य प्राप्त होतें ॥३०॥
दुसर्‍यानें लाविलेला दिवा एका चिचुंद्रीचे पायाने वात सारुन मोठा झाला म्हणून तिला दुर्लभ असा मनुष्यजन्म प्राप्त होऊन ती उत्तम गतीला गेली ॥३१॥
एक पारधी चतुर्दशीला शंकराची पूजा करुन सहज उपाशीं राहिला, म्हणून त्याला उत्तम असा विष्णुलोक प्राप्त झाला ॥३२॥
लीलवती नांवाची चांडालीण दुसर्‍यानें लाविलेल्या दिव्याचें संरक्षण केल्यानें शुद्ध होऊन अक्षय स्वर्गाला गेली ॥३३॥
कोणीं एक गोपानें अमावास्येला विष्णूची पूजा पाहून, जय जय असा वरचेवर शब्द उच्चार केला, म्हणून तो सार्वभौम राजा झाला ॥३४॥
म्हणून सूर्यास्त झाल्यावर कार्तिकांत घरांत, गोठ्यांत व सर्व ठिकाणी दिवे लावावे ॥३५॥
देवळांत, स्मशानांत, सरोवराच्या तीराला, दिपवाळींत पांच दिवस आपल्या कल्याणाकरितां तुपानें अथवा तेलानें दिवे लावावे ॥३६॥
दीपदानापासून पुण्य प्राप्त होऊन, ज्यांच्या श्राद्धादिक क्रिया नष्ट झाल्या आहेत अशा पापी पितरांचा देखील उद्धार होतो ॥६७॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥३४॥

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments