Marathi Biodata Maker

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय चौदावा

Updated: बुधवार, 19 जून 2024 (11:22 IST)
एक्या दुर्वासास अन्न ॥ दहा खंडयांचे पक्वान्न ॥ याशिवाय शिष्याकारण ॥ याप्रमाणें पाहिजे ॥११॥
अन्न सिध्द करुनी श्रीपती ॥ मग भरोनियां पराती ॥ नेते झाले वनाप्रती ॥ समागमें जाती गोपिका ॥१२॥
ऐसें अन्न झालें सिध्द ॥ भरल्या पाटया प्रसिध्द ॥ घेऊनियां गोपिका समस्त ॥ शिरी घेऊनियां चालिल्या ॥१३॥
हरी म्हणे गोपिकांप्रति ॥ हें अन्न न्यावें शीघ्रगती ॥ नेऊन द्यावें ऋषीप्रती ॥ परतिरीं गोमतीच्या ॥१४॥
येरी विनविती जोडुनी कर ॥ कैसें जावें स्वामी पार ॥ अन्न घेऊनि सत्वर ॥ जातों आम्ही आतां ॥१५॥
परी गोमतीस पुत्र अद्भुत ॥ कैसें जावें जी सांगा त्वरित ॥ हरी म्हणे ऐका मात ॥ तुम्हालागीं सांगतों ॥१६॥
ऐसें गोमतीस सांगोन ॥ कीं कृष्णा सोळासहस्त्र गोपी भोगून ॥ ब्रह्मचारी असेल पूर्ण ॥ तरीच आम्हांस मार्ग देई ॥१७॥
ऐसेम बोलतां मार्ग देईल ॥ पाणी उतरोनी जाईल ॥ सुखें परपार पावाल ॥ निश्चय धरा मानसीं ॥१८॥
त्या ह्मणती हें अपूर्व जाण ॥ सोळासहस्त्र कांता भोगून ॥ ब्रह्मचारी म्हणतां पूर्ण ॥ नवल आतां पहावें ॥१९॥
सर्वही शिरीं घेती अन्न ॥ चालिल्या सकळ त्वरें करुन ॥ गोमती तिरा येऊन ॥ प्रार्थना करित्या जाहल्या ॥२०॥
तंव तो पूर भरोनी जातां ॥ येथें काय करावें आतां ॥ मग श्रीकृष्णवचन तत्वतां ॥ सांगत्या झाल्या गोमतिसी ॥२१॥ सकळांही जोडोनीकर ॥ गोमंतीप्रती केला नमस्कार ॥ सोळा सहस्त्र गोपी श्रीधर ॥ भोगुनी ब्रह्मचारी असे ॥२२॥
जरी असेल हे सत्य जाणा ॥ तरी मार्ग देई ह्या जावया वना ॥ ऐसें ऐकतांच वचना ॥ पाणी उतरे तत्क्षणीं ॥२३॥
सत्य मानोनी हरीवचन ॥ मार्ग देती झालीजा ॥ गोमती आनंदोनी मना ॥ मार्ग देतसे तयासी ॥ २४॥
ऐसी करणी हरी करीत ॥ गोपिका झाल्या सप्रेमयुक्त ॥ हरी महिमा जाणोनी अद्भुत ॥ अबला आम्ही काय नेणूं ॥२५॥
गोपिका त्वरें चालती ॥ जेथें दुर्वास महामती ॥ आनंदे नमस्कार घालती ॥ सप्रेमभावें करुनी ॥२६॥
दुर्वास म्हणी तुम्ही कोण ॥ आल्यात अन्ने घेऊन ॥ येरी म्हणती नारायण ॥ त्याच्या स्त्रिया आम्ही आहों ॥२७॥
स्वामीस भोजनालागुनी ॥ पाठविलें षड्रस अन्न ॥ याचा अंगिकार करुन ॥ आज्ञा आम्हांसी देईजे ॥२८॥
मग दुर्वासें अन्न सकळ ॥ भक्षिलें शिष्यासह वर्तमान ॥ तृप्त झाला करुनी भोजन ॥ आशिर्वाद देतसे ॥२९॥
मग दुर्वास तेक्षणीं ॥ बोलिला कृपा करुनी ॥ घरासी येतां परतुनी ॥ भोजनी आम्ही तृप्त जाहलों ॥३०॥
येरी म्हणती प्रताप रुद्र ॥ सत्यवचनीं गुणसमुद्र ॥ महाराजा पुण्यपवित्र ॥ कैसें जावें आतां आम्हीं ॥३१॥
गोमती भरलीसे परिपूर्ण ॥ पूर आला पात्र भरून ॥ आम्ही जावें कैसें जाण ॥ सांगा आतां कृपानिधी ॥३२॥
येरू म्हणे कैशा आल्या ॥ त्या सांगती कृष्ण वचनाला ॥ आनंद न मावे दुर्वासाला ॥ मीही सांगतो तुम्हांसी ॥३३॥
गोमतीजवळी जाऊन ॥ ती सांगावी हे खूण ॥ दुर्वासासाठी अन्न खंडया भक्षुन ॥ निराहार सर्वदां ॥३४॥
ऐसें गोमतीस सांगावें ॥ मार्ग तुम्हांस देईल स्वभावें ॥ ऐकोनी गोपिकाभावें ॥ निघाल्या तेथुनी सर्वही ॥३५॥
मग येवोनी गोमतीतीरीं ॥ हस्त जोडूनी निर्धारी ॥ साठ खंडया अन्न भक्षण निराहारी ॥ दुर्वास असे तरी मार्ग देई ॥३६॥
ऐसें गोमंतीनें ऐकुनियां ॥ गेली तेव्हांच उतरोनियां ॥ मार्ग दिधला जावया ॥ तेच समयीं गोपिकाप्रती ॥३७॥
गोपिका आनंदल्या फार ॥ सत्वर पावल्या द्वारकापुर ॥ हरीस करुनी नमस्कार ॥ श्रीकृष्णासी देखोनियां ॥३८॥
हरीच्या सन्मुख्ह येवोनियां ॥ उभ्या राहिल्या कर जोडूनी ॥ वर्तमान झाला तो सांगोनी ॥ आपुल्या घरोघरीं त्या गेल्या ॥३९॥
ऐकें धर्मा सावधान ॥ कोकिळा व्रताचा महिमान ॥ सांगती त्यास पुण्यपावन ॥ होय जाण सर्वदां ॥४०॥
कोकिळेची पूजा करुन ॥ मग करावें कथा श्रवण ॥ त्या पुण्याचें वर्णन न करवेची सर्वथा ॥४१॥
धर्मास सांगे श्रीहरी ॥ कोकिळाव्रतासी करावें निर्धारी ॥ करील तयासी निर्धारीं ॥ जन्मवरी सौभाग्य प्राप्त होईल ॥४२॥
ऐसा कोकिळेचा महिमा ॥ करेई तयाच्या पुण्याची सीमा ॥ यापरतें व्रत उत्तमा ॥ नाही आणिक दुसरें ॥४३॥
इति श्रीभविष्योत्तरपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्ये ॥ चतुर्दशोऽध्याय: ॥४४॥ ॥ अध्याय ॥१४॥ ओंवी ॥४४॥
॥ श्रीरस्तु ॥
॥ अध्याय १४ वा समाप्त: ॥

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

Guru Purnima Wishes for Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

महादेव मंदिरातील हे शिवलिंग दर १२ वर्षांनी तुटते; त्याचे तुकडे कसे जोडले जातात ते जाणून घ्या

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments