Dharma Sangrah

धुळे शहर व देवपूरमधील ‘संपर्क’ तोडला

शनिवार, 28 मार्च 2020 (11:30 IST)
कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देशातराज्यासहलॉकडाऊन केलेले असताना धुळ्यात देखील टप्प्या-टप्प्याने कठोर अंमलबजावणी सुरु झालेली आहे़. पांझरेवर असणारे पूल बंद करण्यात आल्यामुळे शहर आणि देवपूर भागाचा संपर्क थांबविण्यात आलेला आहे़. अत्यावश्यक सेवेसाठी केवळ लहान पुल सुरु ठेवण्यात आलेला आहे़. दरम्यान, वर्दळीचे चौक सुध्दा आता बंद केले जात आहेत़.
 
शहरातील नागरिकांचे परस्पर संपर्कामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरुन मानवी जिवीताला धोका होऊ नये याकरीता काही प्रतिबंधात्मक उपाययोजना पोलिसांकडून आखल्या जात आहेत़. शहरातील पांझरा नदीवरील गणपती मंदिर ते मोराणकर बंगलाकडे जाणारा पूल, कालिका माता मंदिर ते जयहिंद स्विमींगकडे जाणारा पूल, महात्मा गांधी पुतळा ते पंचवटीकडे जाणारा मोठा पूल असे तीन पूल रहदारीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले़ तर,आपत्कालिन व अत्यावश्यक सेवेसाठी पांझरा नदीवरील दातासरकार ते सावरकर पुतळा दरम्यान असलेला लहान पूल सुरु ठेवलेला आहे़. आवश्यकता असलेल्यांनाच या पुलावरुन वावरता येणार आहे़. याठिकाणी पोलिसांचा खडा पहारा असणार आहे़.
 
>पूल बंद होण्याची ही दुर्मिळ घटना
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळ असणारे पूल बंद होण्याची ही दुर्मिळ घटना आहे, अशा प्रतिक्रिया शहरातील ज्येष्ठ  बोलताना व्यक्त केल्या़ पुर्वीच्या काळी खजाना लुटीची घटना घडल्यानंतर लूट करणाऱ्यांना पकडण्यासाठी मोठा पूल पोलिसांनी बंद केलेला होता़ तसेच १९६९ मध्ये पांझरा नदीला महापूर आलेला होता़ यावेळी मात्र पूल बंद करण्याची वेळ प्रशासनावर आलेली नव्हती़ पूलच बंद झाला होता़ प्लेग, स्वाईन फ्लू असे विविध आजार आले होते़ त्यावेळी मात्र वाहतुकीसाठी पूल बंद करण्याची वेळ ओढवली नव्हती़ यंदा मात्र पूलच बंद करण्याचा कटू प्रसंग ओढवला आहे़

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

Rifts in Mahayuti निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचे नाव गायब, संतप्त शिवसैनिकांचा नवी मुंबईतील कार्यक्रमात राडा

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर बंदी, बंदीमागे कारण काय? जाणून घ्या

महाराष्ट्रावर महादुष्काळाचे संकट! अनेक शहरांत पाणीकपात

नागपुरात IAF अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार आणि बळजबरीने धर्मांतर: दोघांना अटक, मौलवी फरार

महाराष्ट्रात मान्सूनने फिरवली पाठ! 'अल निनो'चे सावट... राज्य थेंब थेंब पाण्यासाठी तरसणार का?

पुढील लेख