suvichar

इंडो- म्यानमार‘मैत्री पूल’खुला

शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (09:16 IST)
भारत - म्यानमारला जोडणारा इंडो- म्यानमार ‘मैत्री पूल’वापरासाठी म्यानमारने खुला केला आहे. मणीपूर सीमेजवळील मोरेह शहरातून जाणारा हा पूल खुला झाल्याने म्यानमारमध्ये जाणाऱ्या हिंदुस्थानींना आता विशेष परमीटची गरज भासणार नाही. ही सीमा खुली झाल्याने दोन्ही देशातील मैत्रीपर्वाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ११ मे रोजी म्यानमार दौऱ्यावर असताना दोन्ही देशातील ही सीमा खुली करण्याबाबत करार झाला होता.
 
तामू- मोरेह या सीमेसह भारत म्यानमार सीमेजवळील चीन प्रातांतील रिखावदार आणि मिझोरामच्या जोखावतार या सीमाही खुल्या करण्यात आल्या आहेत. या सीमा खुल्या झाल्याने दोन्ही देशांचे नागरिक विनापरवाना एकमेकांच्या देशात १६ किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकणार आहेत. रस्तेमार्गाने जोडण्यासाठी आणि संपर्क वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यासाठी दोन मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच ६९ पूलांच्या नुतनीकरणाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गांमुळे म्यानमारशी असलेले भारताचे संबंध सुधारणार आहेत. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने कायदेशीर नोटीस पाठवली

LIVE: एमपीसीबीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस पाठवली

महाराष्ट्र सरकारकडून ४ वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा

एमपीसीबीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस पाठवली

पावसाळ्यात गाडी स्टार्ट होत नाही? मेकॅनिककडे जाण्यापूर्वी हे 5 उपाय करून पाहा

पुढील लेख
Show comments