suvichar

रंगतदार सामन्यात बंगळुरूची बाजी

मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (10:13 IST)
येथील मैदानावर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर सुपर ओव्हरमध्ये मात केली आहे. दोन्ही संघांमध्ये निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटला. मुंबईने सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त सात धावा केल्या. नवदीप सैनीने सुपर ओव्हर टाकताना टिच्चून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. मुंबईचा संघ सुपर ओव्हरमध्ये 7 धावांपर्यंत मजल मारु शकला. ज्यामुळे आरसीबीला विजयासाठी 8 धावांचे सोपे आव्हान मिळाले.

मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपर ओव्हर टाकतानाही भन्नाट मारा केला. परंतु शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना विराटने चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्या आधी, 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार  यादव, क्विंटन डीकॉक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज स्वस्तात मागारी परतले होते. इशान किशनने 58 चेंडूत 2 चौकार आणि 9 षटकारांसह 99 धावा केल्या. अवघ्या एका धावाने त्याचे शतक हुकले. पोलार्डने 60 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

इंग्लंडने भारताला ५६ धावांनी हरवून मालिका ४-० ने जिंकली आणि पुन्हा अव्वल स्थान पटकावले

IND vs ENG: इंग्लंडने भारताविरुद्धची आपली पहिली २+ सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली

भारत व्हाईटवॉश टाळण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंडचे लक्ष्य अव्वल स्थान पटकावण्याचे असेल

झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिकेत बांगलादेशला पराभूत करून मोठा उलटफेर घडवला

सलग पाच टी-२० सामने गमावणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम

पुढील लेख
Show comments