आपल्या घर संसारात कष्ट करणाऱ्या गोपिकांना निखळ, शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देवासाठी त्यांनी आपल्या मुरलीच्या नादाचे वेड लावले. रासक्रीडेत तर प्रत्येकीला कृष्ण पूर्णवेळ आपल्याशीच खेळत होता असे वाटत असे. ही अत्यानंदाची अनुभुती मिळणार्या त्या किती धन्य असतील?
नरकासुराच्या ताब्यात असणार्या 16 हजार स्त्रियांशी लग्न करण्याचे धारिष्ट्य दाखवण्याचे सामर्थ्य फक्त कृष्णातच होते. कारण स्त्रीच्या अब्रूविषयी जिथे आजही 'काचेचे भांडे' वगैरे उपमांनी, तिच्या न केलेल्या चुकीमुळेही आयुष्यभर जिला दु:ख भोगावे लागते, त्यावेळी नरकासुराकडे इतके दिवस बंदिवान असणार्या स्त्रियांना तर त्यांच्या घरची दारे केव्हाच बंद झाली असतील? अशावेळेस त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहिला असता का? म्हणूनच त्याने इतक्या स्त्रियांशी केलेला विवाह हा त्याचा भोगीपणा नसून त्यांना दिलेली जगण्याची संधी ठरते.
' कृष्णशिष्टाई' म्हणून प्रसिद्ध असणारे कृष्णाचे सभेतील वक्तव्य मुळातूनच अभ्यासव्यासारखे आहे. त्याने सत्याचा योग्य पक्ष घेताना त्याची कारणमीमांसा करतानाच कौरवांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधीही देऊ केली होती. शिशुपालाचा वध करण्याआधीही त्याचे 100 अपराध कृष्णाने पोटात घातले होते. समोर स्वत:चे आप्त दिसल्याने युद्धभूमीत अस्वस्थ झालेल्या अर्जुनाला समजावतानाच 'मी युद्धात शस्त्र धरणार नाही' हा स्वत: केलेला 'पण' ही तो मोडण्यास तयार झाला.
सांदिपनींच्या आश्रमात शिक्षण घेताना इतरांप्रमाणेच त्यांनी गुरुगृही काम केले व शेवटही एका सामान्य माणसाप्रमाणे मृत्यू पत्करून आपले अवतार कार्य संपवले. त्यामुळेच तो देव की मानव या वादात अडकण्यापेक्षा त्याने दिलेली शिकवण अंगिकारली तर आपला 'नारायण' व्हायला उशीर होणार नाही.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More