Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अत्याचार घरापर्यंत येण्याची वाट पाहू नका – जाधव

Updated: सोमवार, 30 एप्रिल 2018 (11:05 IST)
 
चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत स्त्री भ्रूण हत्या आणि महिला अत्याचार या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना जाधव बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ऍड. अंतरा देशपांडे होत्या. यावेळी ऍड.ज्योती सोरखेडे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शीतल गोलांडे, सचिव गजानन चिंचवडे, समनव्यक सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
 
यावेळी प्रतिभा जाधव म्हणाल्या की, वृत्तपत्रात रोज बलात्काराच्या घटना वाचून आमच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. भवरी देवी, फूलनदेवी, रिंकू पाटील, अमृता देशपांडे, खैरलांजी, कोपर्डी, कठुआ, उन्नाव किंवा वयाच्या 23 व्या वर्षांपासून कोमात गेलेल्या मुंबईतील परिचारीका अरुणा शानबाग प्रकरणांमधून हेच दिसून आले आहे. आम्हाला कशाचेच काही वाटत नाही कठुआ, उन्नाव प्रकरणानंतर काही मंडळींनी जे अकलेचे तारे तोडले ते पाहून प्रचंड चीड आली, असेही त्या म्हणाल्या.
 
देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी स्त्रीकडे केवळ एक मादी म्हणून पाहण्याचीच आमची मानसिकता अद्याप गेलेली नाही. स्त्रियांवरील बलात्काराच्या घटनांनी हे सिद्ध केले आहे. स्त्री भ्रूण हत्येमागे वंशाला दिवा, हुंडा, मुलगी परक्‍याचे धन याबरोबरच महिलांची असुरक्षितता हेही एक कारण आहे. त्यामुळे महिलांबाबतची समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. आपल्याकडे मुलींना लहानपणापासून दुय्यम वागणूक दिली जाते. मुलाला वेगळी खेळणी आणि मुलीला भातुकली साठी भांडीकुंडी हे असले संस्कार लहानपणापासून केले जातात. नोकरी करत असली तरी कोणत्याही निर्णय प्रक्रियेत तिला सहभागी करून घेतले जात नाही. मुलगी हे परक्‍याचे धन, मुलगा म्हणजे कोरा चेक या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी सांगितले. सूत्रसंचालन वैशाली खोले यांनी केले, तर आभार सुजाता पोफळे यांनी मानले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला

नियमांनुसार काम करता येत नसेल तर राजीनामा द्या…तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

ट्रेनमध्ये धूम्रपान करणे आता खूप महागात पडणार! रेल्वेने दंड २० पटीने वाढवून ₹१०० वरून ₹२,००० केला

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

पुढील लेख
Show comments