Dharma Sangrah

IPL : नवीन वेळापत्रक आखता येईल का यावर विचार

शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (22:02 IST)
देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या गंभीर वातावरणात स्थिती लगेच सामान्य होताना दिसत नाहीये. अशात बीसीसीआयने 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता 15 एप्रिलनंतरही स्पर्धा सुरु होईल की नाही हे सांगणे जरा कठिणच आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय आयपीएलसाठी नवीन वेळापत्रक आखता येईल का याची चाचपणी करत आहे.
 
कारण ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार आहे. परंतू यंदाच्या हंगामात आयपीएल स्पर्धा खेळवायची की नाही यावर अनेक मतमतांतर आहेत. 
 
एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या आयपीएलसाठी नवीन पर्यायांचा विचार करत आहे. ही स्पर्धा अजून दोन-तीन महिने पुढे ढकलता येईल का या पर्यायावर‍ विचार केला जाऊ शकतो. तसेच पूर्वी झालेल्या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने 15 एप्रिलपर्यंत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास आयपीएलचा हंगाम छोटेखानी स्वरुपात खेळवाला लागेल असे संकेत दिले होते. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

विजयानंतर विराट-अनुष्काचा भन्नाट डान्स

ऑरेंज कॅप आणि कारसह पाच पुरस्कार वैभव सूर्यवंशीने पटकावले

मोठी बातमी! हॉटेलकडे जाताना गुजरात टायटन्सच्या बसला आग; शुभमन गिलसह संपूर्ण टीम सुरक्षित

आरसीबीने पुन्हा ट्रॉफी जिंकली: विराट कोहलीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीने आयपीएल २०२६ चे विजेतेपद पटकावले

हरमनप्रीत कौरने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४,००० धावांचा टप्पा गाठत नवा विक्रम रचला

पुढील लेख
Show comments