Festival Posters

हेल्मेटचा अतिरेक चुकीचाच

Updated: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (18:35 IST)
 
रस्त्यावर होणारी अतिक्रमणे हेदेखील अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. आपल्याकडे रस्त्याच्या बाजूने बांधलेले फुटपाथ हे पायी चालणाऱ्या व्यक्तींसाठी राखीव असतात, मात्र या फुटपाथवर बेकायदेशीर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात केलेली दिसतात. महानगरांमध्ये छोटे विक्रेते कायम फुटपाथवर ठाण मांडून बसलेले असतात, याशिवाय देखील अनेक ठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण झालेले दिसून येते, या अतिक्रमणांमुळे वाहनचालक आणि पादचारी या दोघानांही चालायला किंवा वाहने चालवायला पुरेशी जागाच राहत नाही, ही बेशिस्त गर्दी बरेचदा अपघातांना निमंत्रण देत असते. याशिवाय रस्त्यावर उभी असलेली बेकायदेशीर वाहने आणि रस्त्याने स्वैर धावणारी गुरेढोरे हेदेखील अपघाताचे कारण ठरू शकतात.  
 
ही सर्व कारणे सामान्य माणसापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्यांनाच ठावूक आहेत, मात्र या दृष्टीने कधीही प्रयत्न केला जात नाही. ना कधी रस्त्यांची दुरुस्ती होत, ना कधी अतिक्रमणे हटवली जात, ना कधी सर्वसामान्य वाहनचालकांना नियमानुसार वाहने चालवावी असा आग्रह धरला जात, त्यामुळे सगळंच काही बेशिस्त काम सुरु असते, त्यामुळे अपघात वाढतात.
 
वाहतुकीचे सुरळीत संचलन व्हावे, यासाठी सरकारने वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली आहे. या पोलिसांनी चौकात उभे राहून वाहतुकीचे नियंत्रण करावे आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित असते, मात्र नागपूर शहरात बघितल्यास बहुतेक सर्व पोलीस चौकातील एखाद्या झाडाखाली बसून निवांत गप्पा मारत असतात. तिथे काही नियम तोडणारे दिसले तर त्यांचे चालान बनवणे किंवा मग चालान न बनवता चिरीमिरी घेऊन सेटल करणे हे काम हे पोलीस करत असतात. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागतच नाही. त्यातून बेशिस्त वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढत जाते.
 
खरेतर हेल्मेट हे सुरक्षाकवच आहे, हे वापरायचे किंवा नाही, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे, मात्र याची सक्ती केली जाते,  खराब रस्ते, अतिक्रमण किंवा बेशिस्त वाहनचालक यामुळे अपघात झाले तर इतरांना त्याचा धोका आहे. त्यामुळे खरी कारवाई अश्या बेशिस्त वाहनचालकांवर व्हायला हवी. मात्र आमचे वाहतूक पोलीस फक्त हेल्मेट न घालणारे वाहनचालक पकडतात, आणि त्यांना दंड ठोठावतात. हेल्मेट वापरले नाही म्हणून अपघात झाला असे होत नाही. आणि हेल्मेट डोक्यात नसले तर फक्त वाहनचालकाला इजा होते, त्याचा रस्त्यावरील इतर कुणालाही उपद्रव होत नाही. तरीही बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई न करता फक्त हेल्मेट न घालणार्यावरच कारवाई का केली जाते? हे अनाकलनीय गुढ आहे.
 
हेल्मेट सक्तीबद्दल आक्षेप घेतला की न्यायालयाच्या आदेशाची आठवण करून दिली जाते. मात्र रस्ते दुरुस्ती आणि अतिक्रमण हटवणे, याबाबतही न्यायालयाचे आदेश आहेत, हे आम्ही विसरतो. जर रस्ते नीट दुरुस्त झाले, आणि रस्त्यावर अतिक्रमण नसले तर अर्धे अपघात कमी होतील, मात्र त्यासाठी आमचे प्रशासन काहीही करत नाही.
 
हेल्मेट हे वजनदार आहे ते डोक्यावर चढवल्यावर अनेकांच्या मानेच्या हाडांवर परिणाम होऊ शकतो, काहींना स्पॉण्डिलायटिस सारखे आजारही असतात, त्यांना हेल्मेट वापरले तर भर रस्त्यात चक्कर येण्याचीही भीती असते, मात्र याचा आम्ही कधीच विचार करत नाही. आम्ही फक्त हेल्मेटची सक्ती करतो, परिणामी अनेकांना स्कुटर चालवण्यापासून वंचित राहावे लागते.
 
या सर्व बाबी लक्षात घेता अपघात टाळायचे असतील, तर चांगले रस्ते रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवून मोकळे केलेले रस्ते, आणि शिस्त पाळणारे वाहनचालक ही खरी गरज आहे. मात्र यातील कोणत्याही बाबीवर विचार न करता हेल्मेटची होत असलेली सक्ती म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असाच प्रकार म्हणावा लागतो. दुर्दैवाने आपल्या देशात असाच प्रकार वारंवार होतो आहे.
 
हे सर्व मुद्दे लक्षात घेता हेल्मेट सक्ती तर निरर्थक आहेच, मात्र त्याचबरोबर आता लहान मुलांनाही हेल्मेटची सक्ती हा निव्वळ बालिशपणा आहे, हे स्पष्ट होते आहे, प्रशासनाने आणि समाजाने आतातरी याचा विचार करावा, हे अपेक्षित आहे.
 
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
 
ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
 
अविनाश पाठक

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments