Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवीन केरसुणी आणल्यावर लगेच हे करा, लक्ष्मी स्थिर राहील

Updated: शुक्रवार, 10 मे 2019 (13:09 IST)
 
झाडू अर्थात केरसुणी याला देवी लक्ष्मीचा प्रतीक मानले गेले आहे. म्हणतात घरात झाडू रुपी लक्ष्मीचा नेहमी सन्मान करावा ज्यामुळे घरात संपन्नता राहते. झाडू काढून दारिद्र्य अर्थात अलक्ष्मी घरातून बाहेर करता येते.
 
पण आपल्याला हे माहीत आहे का की झाडू खरेदी करून घरी आणण्याचे देखील काही विशेष दिवस असतात. इच्छे प्रमाणे कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करणे अशुभ ठरू शकतं. मंगळवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस झाडू खरेदी करण्यासाठी योग्य आहे. याने स्थिर लक्ष्मी वास करते. 
 
एवढेच नव्हे तर झाडू जुनी झाली असल्यास कोणत्याही दिवशी बाहेर फेकण्यापेक्षा शनिवार हा सर्वात योग्य दिवस ठरेल. या दिवशी दारिद्र्य बाहेर केलं जातं. तसेच चुकूनही शुक्रवारी झाडू घरातून बाहेर फेकू नका. कारण शुक्रवार देवीचा वार आहे आणि या दिवशी झाडू रुपी लक्ष्मीला बाहेर फेकणे म्हणजे घरातील संपन्नता, स्थिरता विस्कटण्यासारखे आहे.
 
आता महत्त्तवाचा उपाय म्हणजे ज्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणाल तर एक काम नक्की करावे. झाडूच्या दांडीवर अर्थात हँडलवर एक पांढरा दोरा बांधावा. पांढरा दोरा बांधल्याने देवी लक्ष्मी घराशी संबद्ध होऊन जाते आणि मग घर सोडून जात नाही. स्थिर होऊन जाते.
 
दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आपल्यावर शनीची साडेसाती, ढैया किंवा दोष असल्यास शनिवारी झाडू खरेदी करण्याची चूक करू नका. याने शनीदेव अधिक नाराज होऊन जातील. आपण रविवारी झाडू खरेदी करू शकता. मात्र झाडू वापरणे शनिवार पासून सुरू करावे.

सर्व पहा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments