Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनालीमध्ये हनीमून साजरा करण्यासाठी अपहरण

Updated: शुक्रवार, 31 मे 2019 (15:23 IST)
 
कानपूर गावच्या पनकी गंगागंज रहिवासी अभिषेक मिश्रा उर्फ प्रांशु याचा विवाह शिवली क्षेत्रातील एका गावात ठरलं होतं. 29 मे रोजी प्रांशुची वरात निघणार होती. 
 
पोलिसांप्रमाणे लग्न ठरल्यावर तरुणाने आपल्या होणार्‍या पत्नीला कुल्लू मनालीला जाऊन हनीमून साजरा करू असा वादा केला. आपली गोष्ट राखण्यासाठी तो पैसे जोडू पाहत होतो आणि त्यासाठी त्याने एका मुलाचं अपहरण केलं. आपल्या आतोबा म्हणजे आत्याच्या नवर्‍याला मुलं आणून देण्याचा दीड लाख रुपयात करार केला. 
 
12 मे रोजी त्याने गावातील राजू सविता यांचा मुलगा विवेकचं अपहरण करून आपल्या गाडीने दिल्ली पोहचला.
 
तेथून आपल्या आत्याच्या नवर्‍याकडून 50 हजार रुपये घेतले, 35 हजार रुपये तो आधीच घेऊन चुकला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यावर असे गंभीर गुन्हा करणार्‍या व्यक्तीसोबत विवाह मोडणे हेच वधू पक्षाला पटले आणि त्यांनी ताबडतोब दहा दिवसात दुसरा मुलगा शोधन 28 मे रोजी मुलीचं लग्न लावून दिले. कानपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख
Show comments