संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात डॉ.सिंग हे काँग्रेससाठी सर्वोत चांगले पर्याय होते. पंतप्रधानपदासाठी मी चांगला पर्याय नव्हतो. हिंदी भाषेवर माझे प्रभुत्व नव्हते. त्यामुळे जनतेशी संवाद साधता येत नव्हता. जनतेशी संवाद साधणारी भाषा येत नसेल तर कोणतीही व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही, असे मुखर्जी म्हणाले.