यावेळी मोदी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप तोगडियांनी केला.
एक माणूस अचानक माझ्या घरात घुसला. त्याने मला सांगितलं की तुमचा एन्काउंटर होणार आहे. आयबीच्या माध्यमातून मला घाबरवलं जात आहे. इतकं असूनही मी काल पोलिसांना सोडून रिक्षातून निघालो होतो. लोकेशन कळू नये म्हणून मी फोन स्वीच ऑफ केला होता. जयपूरला विमान पकडण्यासाठी निघालो होतो, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाटेतच बेशुद्ध पडलो, पुढचं काही आठवत नाही, असं तोगडियांनी सांगितलं.