Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री रेणुका देवी माहात्म्य अध्याय ४

Updated: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (16:24 IST)
रामभद्र कैलासाहून रामश्रृंग पर्वतावर आला.
 
सूत - शौनकादि मुनि हो ! रामभद्र माता-पित्यांची आज्ञा घेऊन कैलास पर्वतावर गेला व तेथे तपश्चरण करून त्याने परमेश्वरास प्रसन्न करून घेतले आणि त्याचेकडून धनुर्विद्येचे शिक्षण घेऊन पार्वतीदेवीकडून अंबिकास्त्राची प्राप्ती करून घेतली व आनंदभरित होत तो रामशृंग पर्वतावर आला आणि आपल्या माता-पित्यास त्याप्रमाणे बंधुनाहि त्याने नमस्कार केला. बरेच दिवस न भेटलेल्या रामभद्राला सर्वांनी प्रेमाने आलिंगन दिले. जमदग्नी ऋषींनी त्याचप्रमाणे रेणुकादेवीनेही त्याला विजयी हो, चिरंजीव हो असा आशिर्वाद दिला. त्यांच्या प्रेमाने संतुष्ट झालेल्या रामभद्राच्या मनात माता-पित्याविषयी अत्यंत भक्ति उत्पन्न झाली व पुष्कळ दिवस सेवा सोडलेला रामभद्र पुनः माता-पित्यांच्या सेवेत तत्पर होऊन राहिला.
 
अशाप्रकारे काही दिवस गेल्यावर दुष्ट क्षत्रियांनी चालविलेल्या साधु-सत्पुरुषांच्या असहनीय छळाची वार्ता जमदग्नी ऋषींना समजली तेव्हा ते अत्यंत क्रोधाविष्ट झाले व त्यांनी आपले प्रखर नेत्र उघडले. त्याबरोबर रामश्रृंग पर्वतावरील वृक्ष वगैरे दग्ध होऊन गेले एवढेच नव्हे तर तेथील जलाशयही उष्ण होऊन त्यांची वाफ येऊ लागली. ती वाफ असह्य झाल्यामुळे तेथील ऋषी तसेच मृगपक्षीही घाबरे होऊन गेले. तेथे राहिलेले सर्व जमदग्नी ऋषींची स्तुतिस्तोत्रे गाउ लागले. हे जाणून ऋषींनी आपले प्रखर नेत्र मिटून वरुणाचे ध्यान केले त्याबरोबर वरुण त्यांचे सन्निध आला व त्याने तेथील असह्य अशी उष्णता शांत केली व तो तेथेच राहू लागला. तेव्हापासून या स्थानास वरुणतीर्थ असे म्हणू लागला. या तीर्थात स्नान केलेले पवित्र होतात. अशी ही जमदग्नी ऋषीच्या उग्रतर कोपाची महती सर्वत्र पसरली व ती कपटी क्षत्रियांना कळून आल्यावर ते आपले कपट कारस्थान गुप्त रीतीने चालवू लागले इकडे रामभद्रही पुनः आपल्या माता-पित्यांची आज्ञा घेऊन कैलासास पार्वती-परमेश्वराचे सन्निध राहू लागला.
 
जमदग्नीच्या आश्रमामध्ये अद्‌भुत प्रसंग घडला ती कथा
 
रामश्रृंग पर्वतावरील ऋषी तसेच ऋषिपत्‍न्याही जमदग्नी-रेणुकादेवींची सेवा करीत व क्षत्रियांचे भय नाहीसे झाल्यामुळे आपली शिवलिंगार्चनादि नित्यकर्मे तसेच यज्ञयागादि कार्येही करू लागले. असे असता नित्याप्रमाणे रेणुकादेवी मलापहारी नदीचे शुद्धोदक आणण्याकरिता गेली तेव्हा त्या दिवशी चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या पत्‍नीबरोबर जलक्रीडा करीत होता. ते रेणुकादेवीनी पाहिले. तेव्हा आपणही आपल्या पतीसमवेत अशीच जलक्रीडा करावी अशी इच्छा रेणुकादेवीच्या मनात उत्पन्न झाली व त्या थोडा वेळ तेथे तशाच उभ्या राहिल्या व त्यांनी आपल्या मनास उपदेश केला की, हे मुर्ख मना ! मी ऋषिपत्‍नी असल्यामुळे या गंधर्वासारखे आचरण करणे हा माझा धर्म नव्हे. आज असा दुर्घट प्रसंग काय म्हणून मजवर आला ? असे म्हणून व आपल्या चंचल मनास उपदेश करून रेणुकादेवी पश्चात्ताप पावली व दुसरीकडे जाऊन तिने नदीत स्नान केले आणि आपले जाडे वस्त्र नेसून चुंबळ करण्याकरिता तेथे असलेल्या सापास धरावे म्हणुन तिने आपले हात पुढे केले, तेव्हा तो साप तिच्या हाती न लागता गुप्त झाला. यामुळे रेणुकादेवींची मनोव्यथा वाढली तरीही आपले समाधान आपणच करून घेऊन चिखलाची घागर करू लागल्या; तेही साध्य होईना. त्यावर शिवशिवा ! आज असे होण्याचे मुख्य कारण माझा चंचल स्वभावच होय आता खचितच ऋषि मजवर कोपणार असे म्हणून रेणुकादेवी गडबडीने ऋषिसन्निध आल्या. त्यावर ऋषि म्हणाले, "रेणुका, आज नित्याप्रमाणे तू अग्रोदक आणले नाहीस. का बरे? माझ्या नित्यक्रमात यामुळे भंग झाला ना ? याचे असेल ते कारण मला स्पष्ट सांग." असे क्रोधाविष्ट होऊन ऋषि तिला म्हणाले तेव्हा रेणुकादेवी हात जोडुन नम्रतेने म्हणाली, ऋषिवर्या, आज माझे मन चंचल होऊन भ्रांत झाले." चित्ररथ गंधर्वाचे दर्शन झाले वगैरेची सर्व हकीकत सांगून अश्रूपूर्ण नयनांनी अधोमुख अशी रेणुकादेवी राहिली. तिकडे लक्ष न देता क्रोधोद्दीपित असे जमदग्नी ऋषि तिला म्हणाले. हे नीच, नीतिभ्रष्ट स्त्रिये ! आज तुझे मन चंचल झाल्यामुळे माझ्या आश्रमास अत्यंत मलीनता आली आहे. "भर्ताच स्त्री कृतं पाप" या वाक्याप्रमाणे तुझे पाप मला लागले आहे आता तू येथे उभी राहु नकोस; जर राहशील तर तुला मी जाळून भस्म करून टाकीन समजले ना?" हे पतीचे बोलणे ऐकून व पतीच्या क्रोधाच्या ज्वाला सहन न होऊन रेणुकादेवीने आपला मलिन देह नाश करुन टाकण्याच्या उद्देशाने ते स्थान सोडण्याचा विचार केला व पश्चिमेकडील वनात प्रवेश केला. तेथे नानाविध कमलांनी त्याचप्रमाणे पोवळी वगैरेच्या वेलीनी, तसेच नाना प्रकारच्या वृक्षांनी शोभणारे एक सरोवर व त्या सरोवराजवळच एक वटवृक्ष तिला दिसला. त्या वृक्षाखाली बसून पतीच्या क्रोधाने कृष्ण झालेला आपला देह धिःकारून रेणुकादेवी दुःख करू लागली. असा काही काळ निघून गेल्यावर तिचे मन शांत झाले व ती निद्रवश झाली. तेव्हा तिच्या स्वप्नात दोन शिवयोगी सिद्ध येऊन तिला म्हणाले, "देवी येथे येऊन तू अशी दुःख का करू लागली आहेस ? आणि तुझे शरीर असे कृष्णवर्ण का झाले आहे ? काहीही असो. तू आता या सरोवरात सचैल स्नान करून हे जाडे वस्त्र नेस" असे म्हणून तेथे एक वस्त्र ठेवून गेले. हे जाणून रेणुकादेवी हात जोडून म्हणाली, "मजसारख्या पापी स्त्रीजवळ आलेले आपण कोण बरे महात्मे आहात ? ते मला सांगा." त्यावर ते म्हणाले. हे देवी, आम्ही एकनाथ, जोगिनाथ म्हणून सिद्ध आहोत व येथे जवळच असलेल्या पर्णकुटीत आम्ही राहतो. या सुगंधवतीचा राजा आम्ही करीत असलेल्या अतिथींच्या उपकारास त्याचप्रमाणे आमच्या लिंगार्चनासही सहाय्य करतो. तुम्ही आता दुःख न करता लवकर स्नान करून आमच्या वासस्थानाजवळ असलेल्या शिवलिंगाची पूजा वगैरे करावी म्हणजे तुमची व्यथा दूर होईल’ असे सांगून ते सिद्ध गुप्त झाले. अशा प्रकारचे स्वप्न पडलेले पाहून रेणुकादेवी जागी झाली व सभोवताली पाहते तो तेथे कोणीच नाही. तेव्हा ती आश्चर्यचकित झाली व खाली पाहू लागली त्यावेळी तिला एक जाडे वस्त्र दिसले. त्याबरोबर ती म्हणाली, "अहो! हे माझे सुदैवच असावे. असे म्हणून सिद्धांच्या आज्ञेप्रमाणे तिने त्या सरोवरात स्नान केले आणि ते जाडे वस्त्र नेसली व त्या सिद्धांचे दर्शन घ्यावे या उद्देशाने पुढे जाऊ लागली. तेव्हा हिच्या पापाचे क्षालन झाले हे सर्व जगास जाहीर करण्याकरिताच चंद्र देवाचे आगमन झाले की काय असा चंद्रोदय झाला, व अंधार नाहीसा झाला. त्यामुळे रेणुकादेवी संतोष पावून त्या सिद्धयांचे नाव घेत त्यांच्या आश्रमात पोचल्या तेव्हा देवीच्या डोक्यावर जलबिंदु पडले व त्यांचा ताप थोडासा शांत झाला. रेणुकादेवीने आश्चर्याने वर पाहिले तेव्हा त्यांना तेथे त्या सिद्ध्यांच्या चंदनी पादुका दिसल्या. या पादुकांवरील जलबिंदू माझ्यावर पडल्यामुळेच माझ्या देहाचा ताप थोडासा शांत झाला हे निःसंशय म्हणुन त्या पादुका घेऊन रेणुकादेवी पुनः सरोवराकडे गेल्या आणि त्या पादुका त्या सरोवराच्या पाण्यामध्ये धुवून तेथे पुनः तिथे स्नान केले. त्यामुळे रेणुकादेवीचा देह ताप समूळ नष्ट झाला व तिचे कृष्णवर्ण झालेले शरीर पुनः पूर्वीसारखेच उज्वल झाले. हा सर्व चमत्कार पाहुन त्या साधूचे महात्म्य गात आनंदतिशयाने रेणुकादेवीनी त्या पादुका आपल्या गळ्यात घालून त्या सिद्धांच्या आज्ञेप्रमाणे शिवलिंगपूजा केली आणि त्याचे पादतीर्थ व त्यांनी दिलेला पंचामृत प्रसाद सेवन करून त्यांची स्तुति-स्तोत्रे गात त्या तेथेच विश्रांतीसाठी बसल्या.
 
दुसरे दिवशी सूर्योदय होताच "गुरुवर्य, माझ्या पतीनी दिलेल्या शापापासून माझा उद्धार करा अशी देवीनी हात जोडून त्यांना प्रार्थना केली. त्यावर ते सिद्ध म्हणाले, ’देवी, तू त्याप्रमाणे तीन दिवस या सरोवरातील जलाने स्नान करून येथील शिवलिंगाच निष्ठापूर्वक पूजा कर व भक्तांच्या घरी भिक्षा मागून मिळालेल्या धान्याचा अर्धा भाग आम्हास देऊन उरलेला अर्ध्या भागाच अन्न तयार करून ते तू सेवन करव व तीन दिवसांनंतर तू तुझे पति जमदग्नी ऋषि यांचे दर्शन घे. असे झाले तरी तुला त्यांच्यापासून प्रायश्चित्त मिळून तू श्री शंकरांच्या आज्ञेने तीन निमिषांचे वैधव्य भोगून नंतर पुनः सुवासिनी होशील व जगद्वद्यही होशी. आता यापुढे तु कसलीही चिंता न करिता येथे राहून तुझे व्रत पुरे कर अशी सिद्धांनी आज्ञा केली. त्यावर एकनाथ-जोगिनाथ उत्कृष्टोभव (उद्‌भवो) असा नामोच्चार करीत भिक्षेने मिळालेल्या धान्यापैकी अर्धे धान्य रेणुकादेवी त्यांना अर्पण करून उरलेले आपण सेवन करू लागली. चौथ्या दिवशी रेणुकादेवीने स्नान-पूजा आटोपून गुरु-पादुका आपल्या बरोबर घेतल्या व रामश्रृंगावरील आपल्या पूजास्थानी ती जाऊन पोचली. तेव्हा हिला पाहून इतर ऋषिपत्‍नींनाही आनंद झाला, व त्यांची चिंताही दूर झाली. नंतर रेणुकादेवीने त्या गुरुपादुका आपल्या पूजास्थानी ठेवल्या व गुरुचे ध्यान करीत जमदग्नी ऋषींच्या स्थानाकडे जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार केला व उठून त्यांच्याकदे दयादृष्टीने हात जोडून ती मागे सरून उभी राहिली. तीन दिवस न भेटलेल्या रेणुकादेवीस पाहून ऋषि अत्यंत क्रृद्ध झाले व ते तिला म्हणाले, "हे महापापी स्त्रिये, तू पुनः मला भेटलीस! जा माझ्या समोर उभि राहू नकोस." हे त्यांचे क्रोधवचन ऐकून रेणुकादेवी कळवळून मागे सरून उभी राहिली.
 
या पुण्याश्रमामध्ये रेणुकादेवी व तिच्या चार पुत्रांच्या प्राणहत्येने उत्पन्न झालेली भीषण परिस्थिती
 
जमदग्नी ऋषींनी वसु-विश्वावसु-बृहद्‌भान-बृहत्कण्व या आपल्या चार पुत्रांना बोलावून ते त्यांना म्हणाले, ’या क्रूर व चंचल अशा स्त्रीचे डोके उडवा’ ही चांडाळीण आमच्या आश्रमात राहून उपयोगी नाही. असे संतापाने डोळ्यातून अग्निच्या ठिणग्या टाकीत त्यांनी सांगितले. पण ते पुत्र तसेच एकीकडे उभे राहिले. हे पाहुन "हे भ्रष्ट हो, पित्याची आज्ञा मुलांना मान्य असावयास पाहिजे. पण ती तुम्ही अवमानित आहात हे तुम्हास योग्य वाटते काय ? आता तुम्ही कोनताही संशय मनात न आणता माझी आज्ञा शिरसावंद्य मानून हिचा शिरच्छेद करा.’ त्यावर ते पुत्र त्यांना म्हणाले, "पित्यापेक्षाहि शंभर पटीने माता श्रेष्ठ आहे असे श्रृतिवाक्य आहे ते धिःकारून निरपराधी अशा या आमच्या मातेचा वध करून या मातृहत्या पापास धनी व्हावे काय ? आम्ही सर्वथा या मातेची हत्या करणार नाही’ असे म्हणून ते न भिता जमदग्नि ऋषिसमोर येऊन उभे राहिले. हे पाहून जमदग्नींचा क्रोध अनावर झाला व त्यांनी आपल्या पुत्रावर कोपास्त्राचा प्रयोग केला. तेव्हा ते सर्व मूर्च्छित होऊन जमिनीवर पडले. हे घातक कृत्य पाहून रेणुकादेवी पुत्रवात्सल्याने त्यांच्यावर पडुन अत्यंत दुःख करू लागली. ही दुःखद घटना व भीषण परिस्थिती पाहून तेथे असलेले ऋषि व ऋषिपत्‍न्या घाबरून गेल्या. इकडे जमदग्नींनी कैलासाकडे हात करून "रामभद्रा, रामभद्रा" अशी हाक मारली, त्याबरोबर रामभद्र येऊन आपल्या पित्याचे सन्मुख उभा राहिला. रामभद्र आलेला पाहून दुःख करीत असलेली रेणुका एकदम चट्टदिशी उठली आणि रामभद्राच्या तोंडाकडे पाहू लागली. तेव्हा जमदग्नी रामभद्रास म्हणाले, ’हे रामभद्रा ! चंचलमनाच्या व महापापी अशा या दुष्टेचे शिरच्छेदन करण्यास तुझ्या चारही भावांना सांगितले असता त्यांनी ते मान्य केले नाही. पहा, ते भूमीवर कसे निश्चेष्ट पडले आहेत. आता तू विलंब न करता हिचे शिरच्छेदन कर’ असे जमदग्नी ऋषी म्हणाले. तेव्हा परम ज्ञानी अशा रामभद्राने पित्यास प्रत्युत्तर न करता आपल्या हातातील अंबिका अस्त्राने रेणुकादेवीच्या शिरास स्पर्श केला, त्याबरोबर देवी भूमीवर पडली.
 
रामभद्राच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी त्याचप्रमाणे चारहीपुत्रांचा प्राण परत आणला व आपल्या जवळील क्रोध त्याग केला.
 
इतके झाल्यावर रामभद्राच्या पितृभक्तीने प्रसन्न झालेल्या जमदग्नीने त्यास संतोषाए आपल्याजवळ बसवून घेतले व त्याच्या मस्तकावर आपला हात फिरवून ते त्याला म्हणाले, "पुत्रा मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तुला जे मागावयाच असेल ते मागून घे.’ मी तुला ते तात्काळ देईन. त्यावर राम

सर्व पहा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या

Guru Purnima Puja Vidhi : गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात कशी करावी गुरुपूजा? जाणून घ्या सोपी पद्धत

Guru Purnima 2026: गुरु पौर्णिमेला गुरुंची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

गुरुपौर्णिमेला श्री गजानन विजय ग्रंथाचे परायण करण्याचे महत्त्व आणि त्यामागील भाव

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments