Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री रेणुका देवी माहात्म्य अध्याय ५

Updated: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (16:28 IST)
 
रुचिकमुनींनी जमदग्नीना आपल्या ह्रदयाशी धरले व त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. तसेच सत्यवतीनेही रेणुकादेवीस आपल्याजवळ बसवून घेतले. तेव्हा अगस्ति ऋषि परशुरामास आपल्याजवळ बोलावून त्याला म्हणाले, ’पार्वती-परमेश्वराच्या अनुग्रहास पात्र झालेल्या व श्री गजाननाकडून सर्व सिद्धिदायक असे परशु अस्त्र मिळविलेल्या महिमाशाली परशुरामा हा सुयोगानिमित्त सर्व देवताप्रीत्यर्थ शांतिहोम करून सर्वांची तृप्ति कर.’ त्यांच्या आज्ञेप्रमाणे परशुरामाने यज्ञकार्य करून सर्व देवतांना क्षेत्रपाल भरवादीता तृप्त करून सोडले ही संतोषजनक वार्ता चोहीकडे प्रसृत करणेकरिता पौर्णिमेच्या चंद्राचे पूर्व दिशेस आगमन झाले. सर्व ऋषिसमूह एका ठिकाणी जमल्यावर रुचिकमुनींनी परशुरामास आपल्याजवळ बोलावले व "परशुरामा, आता उशीर का?" क्रूर कंटक अशा सार्‍या क्षत्रियांचा समूळ संहार करून भूभार हलका कर व तुझ्या माता-पित्यांना कष्ट दिलेल्या कार्तवीर्यार्जुनाचे कातडे जमदग्नी-रेणुकादेवीना आसनाकरिता आणुन दे आणि त्याच्या रक्ताने त्यांचे पाय धू" असे म्हणून त्याचे मस्तकावर आपल्या हात ठेवून त्यास आशिर्वाद दिला. परशुराम म्हणाला, ’आजोबा बरे आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे करतो" असे म्हणून व सर्वांना व सर्वांना नमस्कार करून परशुराम आपल्या शस्त्रास्त्राची जुळवाजुळव करू लागला अशी ही कथा सूत मुनींनी शौनकादि ऋषींना सांगितली.
 
परशुरामाने सर्व क्षत्रियांचा संहार करून भूभार हलका केला ती कथा.
 
सूत - शौनकादि ऋषीहो ! परशुराम त्या पौर्णिमेच्या रात्री आकाशमार्गाने संचार करून दुसरे दिवशी अरूणोदयाचे सुमारास अर्जुनीच्या राजधानीच्या दिंडी दरवाजाजवळ येऊन उभा राहिला व "हे मदोन्मत्त हत्तीसारख्या उन्मत्त झालेल्या अर्जुनी, मी ऋषिकुमार तुझ्याकडे युद्धाची भिक्षा मागणेस आलो आहे तरी लवकरच माझी इच्छा पूर्ण कर" असे म्हणून त्याने सिंहगर्जना केली ही भयंकर गर्जना ऐकलेल्या अर्जुनीने हा परशुरामच असावा अशी अटकळ बांधली व पूर्वीच सज्ज ठेवलेल्या अज्ज ठेवलेल्या शुर सैन्यानिशी तो बाहेर आला व सभोवार पाहतो तो काय जिकडे पहावे तिकडे अनेक रुपधारी परशुरामच परशुराम. त्यांना पाहून अर्जुनीने त्यांच्याशी घनघोर रणसंग्राम सुरु केला. परशुरामाने पार्वती-परमेश्वराकडून मिळविलेल्या अंबिकास्त्र-उरगास्त्र-सर्पास्त्र इत्यादि अस्त्रांनी सर्व क्षत्रियांचा संहार करून त्यांना तुडवून टाकले. भूदेवी दुष्ट क्षत्रियांच्या रक्ताने न्हाऊन हर्षित झाली. आणि भूत-प्रेत-पिशाचादि डकिनी, शाकिनी यांनीही रक्ताचे शिंपणे सुरु केले व आम्हास एक चांगलि संधि मिळाली असे म्हणून नाचून त्या सर्व परशुरामाचा जयजयकार करू लागल्या व त्याच्या पाया पडून त्यांनी आपला संतोष व्यक्त केला. परशुरामानेही त्याना तुम्ही सुखी असा अभयवचन दिले. हे सर्व दुरुन पाहिलेल्या अर्जुनीने तेथे न राहता पलायन केले परशुरामाने त्याचा पाठलाग केला व "हे लोककंटका, कुठे पळून चाललास ? तू स्वर्ग-पाताळ लोकात जाऊन दडून राहिलास तरी तुला सोडतो काय? थांब चांडाळ ! दुष्टा ! हे तुझ्या राजधर्मास शोभते काय?" असे म्हणून परशुरामाने त्याच्यावर शस्त्रास्त्रांचा मारा सुरु केला व अंबिकास्त्राने याचे सहस्त्र बाहु छेदून टाकले. त्याबरोबर दशसहस्त्र बाहू तेथे उत्पन्न होऊन अर्जुनी व परशुराम या दोघांमध्ये अत्यंत घनघोर युद्ध सुरू जाले परशुराम अर्जुनीचे बाहू छेदून छेदून कंटाळला व त्याने त्याजवर मंत्रास्त्राचा प्रयोग केला तेव्हा अर्जुनीस मूर्च्छा आली व तो भूमीवर निश्चेष्ट पडला. याचवेळी "परशुरामा, या दुष्टाचे बाहू छेदण्याचे कष्ट घेऊ नकोस. याने कोणत्याही देवदेवतांकडून शस्त्रास्त्राने नाश न होण्याचा वर श्रीगुरुदत्तात्रेयांकडून मिळविला आहे. तरीही पापी लोककंटक अशा अर्जुनीने साधुसत्पुरूषाना विनाकारण छळून तुझ्या पित्याचा प्राण घेतला आहे व अशा रीतीने हा गुरुवचनभ्रष्ट झाला असल्यामुळे याचा विनाशकाल समीप आला आहे. आता तू इतर कोणत्याही उपायाची योजना न करिता श्री गजाननाच्या प्रसादाने मिळालेल्या परशुने त्याचे पोट फाडून तेथे असलेले अमृत काढून घे. म्हणजे तुझी कार्यसिद्धी होईल. अशी आकाशवाणी झाली ती ऐकून वीर-गंभीर अशा परशुरामाने भूमीवर निश्चेष्ट पडलेल्या अर्जुनीस उठविले व त्याने डोळे उघडण्याच्या आतच परशु शस्त्राने त्याचे पोट फाडून त्यातील अमृत काढून घेऊन आणि त्याचे मांस भूतांना बलि म्हणुन देऊन टाकून रक्त आणि चर्म घेऊन परशुराम रुचिकमुनींजवळ आला आणि त्या रक्ताने त्याने जमदग्नी-रेणुकादेवीचे पाय धुतले. व नंतर त्यांना अमृताने न्हाऊन घालून व दुष्ट क्षत्रियांचे निर्मूलन करून भू-भार हलका केल्याचे त्यांना सांगितले ते ऐकून जमदग्नी-रेणुकादेवीनी "परशुराम! तू धन्य आहेस." असे आनंदाचे उद्‌गार काढले. नंतर परशुरामाने आपण बरोबर आणलेल्या अर्जुनीच्या चर्माचे आपल्या मातापित्यांना आसन करून दिले व त्यावर त्यांना बसवून टाळी वाजवीत आनंदाने नाचत नाचत दीर्घदंड नमस्कार केला. तेथे जमलेल्या सर्वांनी ही परशुरामाची कृती पाहून या नारायणावतारा परशुरामाच्या पराक्रमाची तारीफ केली. त्यावर अगस्ति ऋषि उठून उभे राहिले व म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी परशुरामाची स्तुति केली हे ठीक आहे; पण दुष्टांचे निर्दालन व्हावे व सुष्टाचे परिपालन व्हावे यासाठी अत्यंत उग्र तपाचरण करून परमेश्वरास प्रसन्न करून घेतलेली देवमाता अदिति भूमीवर अयोजित अशी जन्मून, दुष्ट क्षत्रियांचा संहार करून भू-भार हलका केलेल्या परशुरामाचा पराक्रमाला जी कारणीभूत झाली त्या जगदंबा-एकवीरा-रेणुकादेवीला मात्र तुम्ही अजिबात विसरल्यासारखे दिसते म्हणून त्यांनी आपले हात वर करून देवीची स्तुती केली व ते खाली बसले. वसिष्ठऋषींनी अगस्ति ऋषींच्या बोलण्यास अनुमोदन दिले. नंतर सर्वांनी जगदंबा-रेणुका-महामाता की जय असा जयजयकार केला. यावर रुचिकमुनी म्हणाले, "ऋषिपुंगवहो, महा महिमाशाली असे आपण सर्व नारदमूनींच्या सूचनेने येथे आलात व जमदग्नीचे प्राण परत आणून कीर्ती मिळविली याजबद्दल मी आपले उपकार स्मरतो" असे सांगुन या रेणुकादेवीस चार दिवस वैधव्य भोगावे लागून आज पाचवा दिवस लागला तरी आजच्या या शुभ-मुहूर्तावर हिला कांकणे व मंगलसूत्रादि बांधून सुवासिनी करावे अशी त्यांनी व सत्यव्रतीने सर्वांचे प्रार्थना केली. त्यावर त्यांच्या इच्छेप्रमाणे वसिष्ठ-आगस्ति-दुर्वास-शिरश्रृंग-विठोलादि मुनीनी श्री मल्लिकार्जुनास दुग्धाभिषेक करून सुवासिनीच्याकडून तैलतीर्थात जमदग्नी-रेणुकादेवींना तैलाभ्यंगस्नान घातले व शुभ लग्न शुभ तिथीवर कंकण-मंगलसूत्रादि बांधले. सुवासिनी स्त्रियांनी रेणुकादेवीस पंचारती ओवाळितो देवतांनी आनंदसूचक अशी रेणुकादेवी-जमदग्नीवर पुष्पवृष्टि केली, त्यामुळे सर्व लोक आनंदित झाले.
 
वाचकहो ! कृतयुगाचे ४ दिवस रेणुकादेवीस आलेले वैधव्य कलियुगामध्ये ४ महिने होऊन मार्गशीर्ष शु॥ १४ पासून पुढे चैत्र शु ॥ १५ स कंकण-मंगलसूत्रादि धारण होत असलेले आजही सर्वांना माहीत आहे. मंगल कार्य शेवटास गेल्यावर या कार्याकरिता जमलेले राजाधिराज, साधुसत्पुरुष इतर अतिथी-अभ्यागत पंचामृत भोजनाने तृप्त होऊन रेणुकादेवीचे अनन्य भावाने स्तवन करीत आपापल्या स्थानास परत गेले. वसिष्ठ-अगस्ति-वठोल शिरश्रृंग-दुर्वास आदि मुनिश्रेष्ठानी सुरनंदिनिस आपणाजवळ बोलावले व "हे माते. तुला बलात्काराने हरण करून नेण्यात आलेला गुरुवचन भ्रष्ट असा अर्जुनी आपण नाश पावला इतकेच नव्हे तर सार्‍या क्षत्रिय कुलाचा विध्वंस करून अपकीर्तीस पात्र झाला.
 
तू आता या आश्रमात सुखाने रहा असा तिला आशिर्वाद दिला व तिचे पाठीवर हात फिरविला व तिचे समाधान केले. नंतर सर्वांनी जमदग्नी-रेणुकादेवीची भेट घेतली व रुचिकमुनी -सत्यवतीदेवी यांचा निरोप घेऊन ते सर्व ऋषि आपापल्या स्थानी गेले. या मंगलकार्यासाठी आलेल्या एकनाथ-जोगिनाथानी रेणुकादेवीच्या इच्छेप्रमाणे एकदोन दिवस येथे राहून रेणुकादेवीचा भक्तीचा पाहुणाचार स्वीकारला या महाशिवयोगिनी पतीच्या क्रोधामुळे आपणास झालेल्या तापाचे निवारण करून प्रसादाचा अनुग्रह केला वगैरेची हकीकत रेणुकादेवीनी आपल्या सासू-सासर्‍यांना निवेदन केली. ती ऐकून ते, त्याचप्रमाणे जमदग्नी मुनि, परशुराम वगैरे संतोष पावले. नंतर एकनाथ जोगिनाथ यांनी त्या सर्वांचा निरोप घेतला व आपल्या शिष्यांसमवेत ते आपल्या आश्रमास येऊन पोचले.
 
भेटासूर नावाच्या क्रूर दैत्याचा परशुरामाने संहार केला ती कथा
 
लोककंटक झालेल्या क्षत्रिय कुलाचा नाश करून परशुरामाने भू-भार हलका केला व भूदेवीस शांत केले आणि आपल्या माता-पित्यांचे जवळ येऊन तो बसला. एक शत्रु गेला तरी दुसरा पुनः तयार आहेच याप्रमाणे भेटासुर नावाचा दैत्य ऋषींच्या यज्ञ-यागादि कर्मास त्याचप्रमाणे ते देवताप्रीत्यर्थ करीत असलेल्या शांति होम व जपतपादि, शिवलिंगार्चनादि पुण्य कृत्यास कंटकप्राय होऊन त्यांच्या व्रतामध्ये अडथळे आणीत होता. या दुष्टाच्या त्रासास भिऊन तेथे असलेले -सत्पुरुष जमदग्नी रेणुकादेवींच्या जवळ आले व आपले कष्ट निवारण करण्याबद्दल त्यांनी त्यांना हात जोडून विनंती केली. परशुरामाने हे सर्व ऐकले आणि तो वीरावेशाने उभा राहिला व त्या दुष्टाचा क्षणात संहार करतो असे म्हणून त्याने जमदग्नी रेणुकादेवीचा आशिर्वाद मागितला आणि क्षत्रिय कुलाचा संहार केलेला रक्तलांछित परशु हातात घेऊन सिंह गर्जना करीत दशरूपे धारण करून त्या भेटासूरास सहाय्य देणार्‍या शूर किराताची शिरे त्याने क्षणार्धात उडवून दिली. नीला मेधरूपी असा भेटासूर सिंह गर्जना करीत परशूरामासमोर आला. तोच परशूच्या एकाच प्रहाराने त्याचे डोके उडवून त्यास भूमीवर पाडले. परशुरामाचे भयंकर रूप पाहून निरपराधी स्त्री-पुरुष आमचे रक्षण करा, आमचे रक्षण करा असा आक्रोश करीत परशुरामास शरण आले. परशुरामाने त्या सर्वांचे सांत्वन केले व भेटासुराचे डोके घेऊन त्यास ब्रह्मरंध्रापर्यंत छिद्र पाडले आणि त्याचे स्नायु त्यात ओवून ती चवकडी करून वाजवा असे शरण आलेल्यांस सांगून ते त्याच्या हातात दिले. त्यांनी ते त्यांच्या हाती दिले. त्यांनी ते हातात घेऊन वाजविताच त्यातून "त्रि नृणां, त्रि नृणा" असा ध्वनि निघू लागला. या शद्बाच्या ध्वनीने आनंद पावून सर्वजण टाळ्या वाजवीत नाचू लागले. व परशुरामाच्या आज्ञेने, समोर असलेल्या रेणुकादेवीस सांगितले व निरपराधी अशा शरणागत स्त्री-पुरुषांच्यावर कृपा करण्याबद्दल विनवून आपण तेथिल एका पुष्करणीत स्नान करून शांत झाला तेव्हापासून त्या पुष्करणीस रामतीर्थ असे नाव पडले आहे. रेणुकादेवीने निरपराधी अशा शरणागत स्त्री-पुरुषावर कृपा करून त्यांचा उद्धार केला.
 
जिवंत राहिलेल्या क्षत्रिय राजांच्या स्त्रिया व इतर स्त्री-पुरुष परशुरामास शरण आले
 
सर्व क्षत्रियांचा नाश केल्यानंतर परशुरामाच्या दृष्टीस न पडलेल्या राजस्त्रिया त्याचप्रमाणे इतर स्त्री-पुरुष दिंड मूढ होऊन अंगावरील वस्त्राचीही पर्वा न करता "परशुरामा, परशुरामा" असे ओरडत शरण आले. तेव्हा परशुरामाने कडूनिंबाच्या डाहाळ्या मोडून त्यांच्या अंगावर टाकल्या, त्याबरोबर त्या स्मृति घेऊन ते "परशुरामा आमचे रक्षण कर" असे म्हणू लागले. हे ऐकून परशुरामाने, त्यांना जवळच असलेल्या जोगिनाथ तीर्थात स्नान करून कडूनिंबाची पाने पांघरा व डाहाळ्या तोंडात धरून हात जोडून रेणुकादेवीस शरण जा आणि तिच्या सांगण्याप्रमाणे वागा म्हणजे तुमचे पाप नाश होतील असे यांना सांगितले. परशुरामाच्या सांगण्याप्रमाणे ते देवीस शरण आले व "महामाते, आम्ही दीन आहोत, आमचे रक्षण कर" असे म्हणाले. त्यांचा दीन भाव पाहून रेणुकादेवीने त्यांच्यावर कृपादृष्टी केली व त्यांना म्हणाली, "तुम्ही येथील तीर्थामध्ये स्नान करा व पांढरे वस्त्र नेसून तसलीच चोळी घाला व कपाळास हळदीची पूड लावून मी देत असलेला पांढरा मणि व कवड्या यांची माळ करून गळ्यात घाला व ही मेसीची बुट्टी हातात घेऊन ’एकनाथ-जोगेश उद्‌भवतो’ असा माझ्या गुरुचा नामोच्चार करीत भिक्षा मागा. भिक्षेत आलेल्या धान्यातील अर्धे धान्य गोरगरिबांना देऊन बाकीचे तुम्ही अन्न करून का" असे सांगितले. देवीच्या या उपदेशाप्रमाणे वागून त्यांनी आपली पापे नाहीशी करून घेतली. या देवीचे हे माहात्म्य जाणुन आजही या देवीचे भक्त त्याचप्रमाणे वागून आपली पापे नाहिशी करून घेऊन आपले इष्टार्थ सिद्ध करून घेतात व देवीस तन-मन-धन देऊन शरण येतात हे सर्वविश्रुत आहे यात काही शंका नाही.
 
परशुरामाने संपादन केलेली भूमि कश्यप ब्रम्ह्याला दान देऊन टाकलि व तो विरक्त झाला ती कथा
 
रुचिकमुनि-सत्यवती, जमदग्नी-रेणुकादेवी, परशुराम, इतर ऋषि व ऋषिपत्‍न्या संतोषाने रहात असता आजा रुचिकमुनि परशुरामास म्हणाला, "हे परशुरामा. भूदेवी आता शांत झाली ना? आता तू क्षात्रवृत्तीचा त्याग करून भुत्रदयादि श

सर्व पहा

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि नामस्मरणामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती लाभते

श्रावण महिन्यात महिलांनी कोणते नियम पाळावेत?

गटारी अमावस्येला मांसाहार करण्याची परंपरा का? जाणून घ्या या दिवसामागचं खास कारण

श्रावण शुक्रवार जिवती पूजन २०२६: पूजा साहित्य, विधी, नैवेद्य, आरती आणि कथा (संपूर्ण माहिती)

श्रावण सोमवारची पूजा कशी करावी? संपूर्ण आणि सोपी विधी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments