Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है…! छगन भुजबळांचा इशारा

Updated: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:28 IST)
 
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेतेही देगलूरमध्ये ठाण मांडून आहेत. छगन भुजबळ यांनीही देगलूरमध्ये जाऊन काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शेरोशायरीची पखरण करत आपल्या खास शैलीत भाजपवर हल्ला चढवला. ‘ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है आज तेरा है कल मेरा होगा…’ अशा शायराना अंदाजात भुजबळ यांनी ईडी च्या कारवायांबाबत वक्तव्य केले. कितीही कारवाया केल्या तरी मी बदलणार नाही, असंही ते म्हणाले.
 
ही सभा मला मोठ्या दुःखद अंतकरणाने घ्यावी लागत आहे. कै. रावसाहेब अंतापुरकर यांनी कोरोना काळात सर्व सामान्यांची सेवा केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाकाळात देखील त्यांचे जनसेवेचे काम चालू होते अश्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. आता जी निवडणूक होणार आहे त्यात रावसाहेबांचा मुलगा जितेश रावसाहेब अंतापुरकर हा महाविकास आघाडीतर्फे उभा आहे. जितेश हा उच्च शिक्षित आहे. आपले शिक्षण पूर्ण करून तो स्वतःच्या पायावर उभा होता. मात्र दुर्दैवाने रावसाहेबांचा मृत्यू झाला आणि जितेशला निवडणुकीत भाग घ्यावा लागला आता आपली जबाबदारी आहे त्याला विजय केले पाहिजे. असं आवाहन त्यांनी केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी योग्य पद्धतीने काम करत आहे. कोरोना काळात भाजपचे सरकार ज्या राज्यात आहे त्या उत्तर प्रदेश, आणि बिहार राज्याची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. त्याच्या कित्येक पटीने चांगले काम महाराष्ट्र राज्याने केले आहे, असंही त्यांनी सांगितलं. देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीत सर्वांनी आप आपसातले वाद मिटवत एकत्र आले पाहिजे आणि भाजपच्या उमेदवारचे डिपॉझिट कोणत्याही परिस्थितीत जप्त झाले पाहिजे, असे आवाहनच त्यांनी देगलूर वासियांना केले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका; कळंब नगरपरिषदेचे १० नगरसेवक भाजपच्या वाटेवर

साखरेचे भाव ६५ रुपये प्रति किलोवर; १५ दिवसांत १५ रुपयांची वाढ—भाव का वाढत आहेत?

सासूने ३ लाख रुपये देऊन सुपारी देऊन सूनची हत्या करवली; घाटकोपर हत्या प्रकरणाचा उलगडा, ५ जणांना अटक

LIVE: मुंबईतील १९ झोपडपट्ट्यांच्या 'क्लस्टर पुनर्विकासा'चे नियोजन; ६.१७ लाख घरे बांधण्याची तयारी सुरू

पुण्यात रीलस्टार तरुणीचा कॅफेबाहेर सातारच्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments