suvichar

मुंबई: ढिगाऱ्याखालून एका लहान मुलाला वाचवण्यात यश

मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग नावाच्या इमारतीचा बराचसा भाग कोसळला असून तिथे 40-50 अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
ही चार मजली इमारत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.  
 
जवानांना एका लहान मुलाला ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश मिळालं आहे.
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, "मी दर्ग्यात होतो मागे तेवढ्यात एक माणूस धावत आला की बिल्डिंग कोसळली. ही कमीत कमी 80 वर्ष जुनी बिल्डिंग असेल. या भागातल्या सगळ्या बिल्डिंग या जुन्या आहे. अजूनही 30-40 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे."
 
या इमारतीत सहा-सात कुटुंब राहात असल्याची माहिती मिळत आहे.
 
भायखळ्याचे आमदार वारिस पठाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "आम्ही सरकारकडे गेले 4 वर्षांपासून धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतो आहोत पण सरकारने त्याकडे लक्ष दिलेलं नाही." प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अशा घटना घडतात असा आरोपही त्यांनी केला.
 
हा परिसर दाटीवाटीचा, अरुंद गल्ल्यांचा आणि गर्दीचा असल्याने इथे मदतकार्यात अडचणी येत आहेत.
 
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाली की, "ही साधारण 100 वर्ष जुनी इमारत होती. म्हाडाच्या अतिशय धोकादायक इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश नव्हता. म्हणजे म्हाडाने कारवाई करून रिकाम्या कराव्या लागणाऱ्या इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश नव्हता. पण विकासकाने वेळेत काम केलं की नाही याची चौकशी करावी लागेल. ती आम्ही करूच. पण सध्या मुख्य मुद्दा आहे तो ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचा. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. ती जागा अतिशय अरुंद असल्याने, तिथे गर्दी न होता बचावकार्य झालं पाहिजे. किती लोकांचा मृत्यू झाला याची माहिती अजून मिळली नाही. तिथे साधारण 15 कुटुंब राहात होती अशी माहिती मला मिळाली आहे."
 
गृहनिर्माण मंत्री तिथे गेलेत. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना आवश्यक मदतीच आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात येतील, असंही ते पुढे म्हणाले.
 
मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगडाले यांनी या घटनेविषयी बोलताना सांगितलं की, "चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली लोक अडकले आहेत. शोधमोहीम सुरू आहे. आजूबाजूच्या इमारतींना धोका असून त्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि जेसीबीच्या सहाय्याने मदतकार्य सुरू आहे. NDRF ला पाचारण करण्यात आलं आहे." 
 
जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

रोहित पवार यांच्या उपोषणापुढे फडणवीस सरकार नमले! शेतकरी कर्जमाफीच्या अटींमध्ये बदल करण्याचे आश्वासन

१० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सर्वोत्तम गाड्या, सर्वोत्तम पेट्रोल आणि सीएनजी पर्याय

LIVE: फडणवीस सरकार रोहित पवरांच्या उपोषणापुढे झुकले! शेतकरी कर्जमाफीच्या अटी बदलणार

विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आजपासून शाळा सुरु होणार

१५ जून १८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा पुनर्विवाह आजच्याच दिवशी पार पडला होता

पुढील लेख
Show comments