suvichar

साडेचार कोटी रुपयांचे सोने फेकले विहरीत

सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:03 IST)
हो असा प्रकार समोर आला आहे नाशिक मध्ये. पिंपळगाव बसवंत येथे एका सोनाराच्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली होती. मग चोरी केली आणि सोबत सीसीटीव्ही सुद्धा पळवले होते. मात्र कोणाला शंका येवू नये म्हणून एका शेतातील विहरीत पंधरा किलो सोने त्यांनी लपवण्यासाठी टाकून दिले होते. पोलिसांनी इकडे तपास सुरु केला, दुकानातील चोरी कशी झाले हे तपासले. नंतर त्यांनी याठिकाणी असलेल्या सर्व लोकांची तपासणी केली त्यात दुकानातील एक कर्मचारी अचानक सुट्टीवर गेला होता. पोलिसांनी तपास केला. आधीच पुरावे कमी त्यात चोरी झाले तेव्हाचे सर्व सीसी टीव्ही फुटेज चोर घेवून पळाले होते. मात्र पोलिसांनी अखेर छडा लावला आणि हे सर्व चोर पकडले गेले. त्यांनी हे साडेचार कोटी रुपयांचे सोने विहरीत फेकले होते. मग पोलिसांनी विहरीत उतरायला पाणबुड्या बोलवला आणि सर्व सोने बाहेर काढले आहे.

काय आहे प्रकरण :

पिपळगाव बसवंत येथील भरवस्तीतील सराफाच्या दुकानाचे कुलूप तोडून गुरुवारी (दि. २१) रात्रीअज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत दुकानातील तिजोरी बनावट चावीने उघडून सुमारे १५ किलो सोने चोरून नेले होते. हे सोने सुमारे किंमत सुमारे चार कोटी रुपये  आहे.  मुंबई - आग्रा महामार्गावर अशोक चोपडा यांचे श्रीनिवास ज्वेलर्स हे शोरूम आहे सदर दुकान हे दुमजली असूनवरील मजल्यावर मालक स्वत: राहतात.  गुरुवारी रात्री चोरट्यांनी दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला व लॉकर बनावट चावीने उघडले. त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन गेला होता.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: वैजापूर-गंगापूर रस्त्यावर भीषण अपघात, १९ जखमीं

वैजापूर-गंगापूर रस्त्यावर भीषण अपघात, १९ जखमीं

खरिपाचे गणित चुकणार नाही! कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी कृषी तज्ज्ञांचा हा मोलाचा सल्ला

पुणे महावितरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचखोरी प्रकरणात अटक

भारत नक्कीच 'विश्वगुरू' बनेल,भविष्याबद्दल शंका घेऊ नका मोहन भागवत यांचे विधान

पुढील लेख
Show comments