मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीत साप सोडण्या संदर्भात जे वक्तव्य केले त्यामुळेच मराठा समाजातील आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत. आंदोलन शांततेत सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी बेजबाबदार वक्तव्यं करू नेये तर असे वक्तव्य केल्याने आगीत तेल ओतले अशीही टीका शरद पवार यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.