Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ना राफेलची कागदपत्रे सांभाळता येत नाहीत, ते देश काय सांभाळणार? - शरद पवार

Updated: बुधवार, 27 मार्च 2019 (17:50 IST)
 
“पाच वर्ष ज्यांनी देशाचा कारभार संभाळला त्यांनी दलित, आदिवासी, मराठा, धनगर, मुस्लिम अशा अनेक समाजांना तसेच देशातील तरुणांना फसवण्याचे काम केले आहे. त्यामुळेच या मोदी सरकारला धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीने राजेश विटेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे,” असे मत या वेळी पवार यांनी व्यक्त केले.
 
आपण सर्वजण काळ्या आईच्या कुशीत वाढलो. या देशातील सव्वाशे कोटींची भूक मिटवणारा बळीराजा जेव्हा कर्जाच्या संकटात होता, तेव्हा आम्ही सत्तेत असताना पंतप्रधानांशी चर्चा करुन ७० हजार कोटींचे कर्ज माफ करून बळीराजाला अनेक सवलती मिळवून दिल्या. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून केवळ भाषणे देत आले आहे. देशाच्या बळीराजावर असलेले संकट दूर करण्याची आजच्या सत्ताधाऱ्यांची भूमिकाच नाही. त्यामुळे हे सरकार घालवण्याचे काम आपण करायचे आहे, असे आवाहन पवार यांनी केले.
 
भाजप सरकारच्या काळात आरबीआय गव्हर्नरांनी तीन महिन्यांत राजीनामा दिला. देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला करण्याचे काम या सरकारने केले. आमच्या कार्यकाळात साडेतीनशे कोटीला ठरलेले राफेल विमान १६०० कोटीला खरेदी करण्याचे काम मोदींनी केले. सुप्रीम कोर्टाने राफेलच्या कागदपत्रांची मागणी केली असता, ते हरवल्याचे मोदी सरकारने न्यायालयात सांगितले. ज्यांना राफेलची कागदपत्रे सांभाळता आली नाहीत, ते देश काय संभाळणार, अशी टीकाही पवार यांनी केली.
 
परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी अर्ज भरल्यानंतर सभेतील उपस्थितांसमोर भावना व्यक्त केल्या. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

मुख्यमंत्री विजय आणि अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी या १५ गोष्टी नक्की तपासा; मोठे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण चेकलिस्ट

राज ठाकरेंच्या सिद्धिविनायकाच्या आरोपांवर सदा सरवणकर यांनी दिले प्रत्युत्तर

LIVE: महाराष्ट्र सरकारने किनारपट्टी भागातील मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवली

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया 'अ' महिला संघाची घोषणा, मालिका तीन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार

पुढील लेख
Show comments