रविवार, 29 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (15:13 IST)

हा तर नाना पटोलेंचा पराभव; विजयानंतर बावनकुळेंचा टोला

विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावेळी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपण आज मिळवलेला विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीत काँग्रेसने घोडेबाजार केला. मला ३६२ मते मिळाली. त्यात ४४ मते जास्त पडली. मी सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
बावनकुळे म्हणाले की, या निवडणुकीत त्यांनी आणि महाविकास आघाडीने पैशांचा अक्षरशः घोडेबाजार मांडला होता. त्यांनी पदाचा गैरवापर केला. नाना पटोले यांच्या मोगलाईमुळेच काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. बावनकुळे पुढे म्हणाले की, मी पक्षाचे दहा वर्षे काम केले आहे. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या हुकमशाही काँग्रेसचा पराभव झाला, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.