पालघर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले.राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या अनामिकेला शाई लावणेचे निर्देश दिले असल्याने भारत निवडणूक आयोगास अन्य बोटाला शाई लावण्यास मान्यता देण्याची विनंती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी केली. त्यानुसार डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याची मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.