Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीएफ खातेधारक कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत खाते उघडवू शकतात. जाणून घ्या नियम

Updated: सोमवार, 29 जून 2020 (20:40 IST)
 
सरकारने ईपीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या साठी सरकारने 22 ऑगस्ट 2014 रोजी एक अधिसूचना जारी केली होती, त्या अंतर्गत सरकारने दोन महत्त्वपूर्ण बदल केले होते. पहिले, भविष्य निर्वाह निधी योजनेत सामील होण्यासाठी मासिक पगाराची मर्यादा वाढविण्यात आली आहे. या पूर्वी ही सीमा 6,500 रुपये होती ज्याला वाढवून 15,000 रुपये करण्यात आले. 
 
दुसरे बदल असे की मासिक पगार 15,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास कोणताही कर्मचारी, पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तज्ज्ञांनी या बाबत शहानिशा केल्यावर ते म्हणाले की कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार जर 6,500 रुपयांपेक्षा कमी असल्यास त्याला ईपीएफ आणि ईपीएस योजनेत सक्तीने सामील व्हावे लागतं. 
 
पूर्वी कर्मचार्‍याचा पगार 6,500 रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यांना ईपीएफ योजनेत सामील होणे पर्यायी होते. कर्मचारी ईपीएफ आणि ईपीएस दोन्ही योजनेत खाते उघडू शकत होते. आता मासिक पगार 15,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे कर्मचारी या पेन्शन योजनेत सामील होऊ शकत नाही. 
 
ईपीएफ नियम काय म्हणतो ?
ईपीएफ योजनेच्या नियमानुसार कर्मचारी आपल्या पगाराचा 12 टक्के वाटा ईपीएफ योजनेच्या अंतर्गत देतात आणि तेवढेच टक्के कंपनी योगदान देते. या 24 टक्केवारी योगदानात कर्मचार्‍याचे 12 टक्के तर कंपनीचे 3.67 टक्के ईपीएफ च्या खात्यात जातात. उर्वरित 8.67 टक्के ईपीएसच्या खात्यात जाणार. कोणाला ही ईपीएस खाते उघडण्याची परवानगी नसल्यास, कंपनी ईपीएफ खात्यामध्ये पूर्णपणे योगदान देईल. या व्यतिरिक्त जर कर्मचार्‍याच ईपीएस खाते असल्यास तर अनिवार्य ईपीएस योगदानापेक्षा जास्त रक्कम (1,250)  ईपीएफ खात्यामध्ये जाणार.
 
जर खाते 1 सप्टेंबर पेक्षा आधी उघडले असल्यास काय होणार?
तज्ज्ञानुसार जे कर्मचारी पेन्शन योजनेशी 1 सप्टेंबर 2014 च्या पूर्वीपासून जोडले गेले आहेत, ते कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान देतील. या मध्ये त्यांचा पगाराशी काहीही एक संबंध नसावा.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

जनरल आणि स्लीपर डब्यांमध्ये आता जागांसाठी धक्काबुक्की होणार नाही; रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही योजना आखली

नाशिकमध्ये नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या नवविवाहित जोडप्याचा अपघातात मृत्यू

मी निवडणूक लढवणार नाही, महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा

पावसामुळे पुण्यात डेंग्यूचा धोका वाढला, पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सतर्क केले

फडणवीस यांनी नागपूरहून पालिका भरतीला हिरवा कंदील दाखवल्याची घोषणा केली, ५७९ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे मिळाली

पुढील लेख
Show comments