गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. जैन
  3. जैन धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (12:57 IST)

भगवान महावीर स्वामी कथा: उन्मत्त हत्ती शांत झाला

Lord Mahavir Swami Story: The frantic elephant became calm
राजा सिद्धार्थाच्या अंगणात शेकडो हत्ती होते. एके दिवशी दोन हत्ती चार्‍यावरून भिडले. त्यातील एक हत्ती उन्मत्त झाला आणि गजशाळेतून पळून गेला. जो कोणी त्याच्यापुढे आला तो चिरडला गेला. त्याने शेकडो झाडे उन्मळून पडली, घरे उद्ध्वस्त केली आणि दहशत पसरवली.
 
महाराजा सिद्धार्थाचे अनेक माहूत आणि सैनिक त्याला एकत्रही काबूत आणू शकले नाहीत. वर्द्धमान यांना ही बातमी कळताच त्याने राज्यातील घाबरलेल्या लोकांना धीर दिला आणि तो स्वतः त्या हत्तीच्या शोधात निघाले.
 
प्रजेने सुटकेचा नि:श्वास सोडला, कारण त्यांचा वर्द्धमानांच्या सामर्थ्यावर विश्वास होता. त्यांची ताकद आणि पराक्रम चांगलेच माहीत होते. एका ठिकाणी हत्ती आणि वर्धमान समोरासमोर आले. दुरून हत्ती सुसाट वेगाने पळत होता, जणू त्यांना चिरडून टाकणार होता. पण त्यांच्या समोर पोहोचल्यावर असा थांबला जणू एखाद्या वाहानाला आपतकालीन ब्रेक लावण्यात येतात.
 
त्यांच्या डोळ्यात पाहत महावीर गोड स्वरात म्हणाले- 'हे गजराज! कृपया शांत व्हा! तुमच्या मागील जन्माच्या परिणामी, तुम्हाला प्राणी योनीत जन्म घ्यावा लागला. या जन्मातही जर तुम्ही हिंसाचाराचा त्याग केला नाही तर पुढच्या जन्मात तुम्हाला नरकयातना भोगाव्या लागतील. हीच वेळ आहे, तुम्ही अहिंसेचे पालन करून तुमचे भावी जीवन आनंदी करू शकता.
 
वर्द्धमानांची ती शिकवण हत्तीच्या विवेकाला भिडली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी सोंड उचलून त्यांचे अभिवादन केले आणि शांतपणे गजशाळेत परतला.