१८० कोटींचा बजेट असलेल्या भन्साळी यांच्या चित्रपटाला सुरुवातीपासूनच राजपूत संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट निर्मिती केल्याचा आरोप राजपूत करणी सेनेने केला आहे. त्यानंतर देशभरात ठिकठिकाणी याविरोधात आंदोलने, निदर्शनेदेखील झाली होती. सेन्सॉर बोर्डाने अखेर हा तिढा सोडवण्यासाठी इतिहासकार आणि राजघराण्याच्या उत्तराधिकाऱ्यांची सहा सदस्यीय समिती नेमली. या समितीने काही बदल सुचवले. आता चित्रपट रिलीज होत आहे.