संबंधित माहिती
- राग नाहीसा होईल, जाणून घ्या कामाच्या 7 टिप्स
- करोनाचा फैलाव अद्यापही नियंत्रणा बाहेर, ४ दिवसांत ९११ जणांचे मृत्यू
- सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने बनविलेले मटण बिर्याणी तर करिश्माने असे केले कौतुक
- उच्च रक्तदाब (High BP) असलेल्या रुग्णांचा आहार असा असावा
- मलेरिया होणार हद्दपार? डासांपासून होणाऱ्या रोगाला आळा घालण्यात शास्त्रज्ञांना मोठं यश
कोरोना: धारावी नियंत्रणात, केंद्राकडून ठाकरे सरकारचं कौतुक
मुंबईत धारावीत गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनानं थैमान घातलं होतं. अखेर धारावीतल्या रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश मिळालंय. त्यामुळे केंद्र सरकारनेही ठाकरे सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय.
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं धारावीत कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाची केंद्र सरकारनं दखल घेत, कौतुक केलंय.
मे महिन्यात धारावीत रुग्णवाढीचा दर 4.3 टक्के होता. हाच दर आता म्हणजे जून महिन्यात 1.2 झाला आहे.
एवढंच नव्हे, तर धारावीतल्या कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा वेगही आता 78 दिवसांवर आलाय.
दाटीवाटीचा भाग असूनही मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं काँटॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनचं काटेकोर पालन इत्यादी उपाययोजनांमधून धारावीत कोरोनाला नियंत्रित केलंय.
