संबंधित माहिती
- महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या झाली एक लाखावर
- राज्यात कोरोना बाधित ७८९ रुग्ण बरे होऊन घरी
- कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला; राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दिलासा
- रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्ट म्हणजे काय, केंद्राने त्याला स्थिगिती का दिली?
- ५५२ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ५२१८ - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई-पुण्यात लॉकडाउन 18 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो: आरोग्यमंत्री
देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या 3 मे रोजी संपणार आहे. पण मुंबई आणि पुणे या दोन शहरात लॉकडाउनचा कालावधी 18 मे पर्यंत वाढवण्यात येऊ शकते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल संकेत दिले.
मुंबई आणि पुण्यात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या निर्णय घेतला जाऊ शकतो. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती एका ऑनलाईन पोर्टलशी बोलताना दिली.
लाइव्ह मिंटशी बोलताना ते म्हणाले की “करोना व्हायरसचा वेगाने पसरत असून याचा फैलाव रोखणे हा लॉकडाउन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. अशात फैलाव कमी होत नसेल तर राज्यात लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल.
