1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (22:12 IST)

पहिल्यांदाच गुरुवारचे व्रत ठेवत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी व्रत करावे. भगवान विष्णूच्या उपासनेमध्ये हे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. असे म्हटले जाते की भगवान विष्णूची पूजा केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात, परंतु जीवनात सुख-समृद्धीही येते. असे मानले जाते की भगवान बृहस्पतिची पूजा केल्याने दीर्घायुष्य मिळते, नि:संतान जोडप्यांना देखील संतती, धन आणि कीर्ती मिळते. असंही मानलं जातं की ज्या लोकांना अस्पष्ट किंवा अज्ञात कारणांमुळे लग्नाला उशीर होत आहे तेही गुरुवारी उपवास करू शकतात.
 
गुरुवारी उपवास करूनही अनेक समस्या दूर होऊ शकतात. जर तुम्ही पहिल्यांदाच गुरुवारी उपवास करणार असाल तर त्यासंबंधी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत.... 
उपवासाचे महत्त्व
गुरुवारचे व्रत भगवान बृहस्पती आणि भगवान विष्णूसाठी ठेवले जाते. भगवान विष्णू ज्यांना विश्वाचा रक्षक म्हणूनही ओळखले जाते. बृहस्पति हे सूर्यमालेतील बृहस्पति ग्रहाद्वारे दर्शविले जाते. त्याला गुरु असेही म्हणतात. म्हणूनच बृहस्पतिवारला गुरुवार असेही म्हणतात. 
या गोष्टी लक्षात ठेवा
1. पौष महिना हा प्रथमच व्रत पाळण्यासाठी शुभ मानला जातो. त्यामुळे या महिन्यात जर तुम्ही गुरुवारचे व्रत सुरू केले तर ते खूप चांगले सिद्ध होईल.
2. व्रताच्या वेळी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करूनच भगवान विष्णूची पूजा करा. भगवान विष्णूला पिवळा रंग खूप प्रिय आहे, असे मानले जाते.
3. भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर गूळ, हरभरा डाळ आणि पिवळे कापड या पिवळ्या वस्तू देवाला अर्पण करा आणि नंतर गरजूंना दान करा.
4. केळीच्या झाडावर भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते त्यामुळे व्रताच्या दिवशी केळी खाणे टाळावे.
5. गुरुवारी केशर किंवा हळदीचा तिलक लावा.