गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (13:00 IST)

भारतात फक्त 36 टक्के लोकच करतात इंटरनेटचा वापर, टॅबलेट यूजरची संख्या फक्त एक टक्के

संपूर्ण जगाच्या तुलनेत सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक भारताकडे आहे, पण एक कडू सत्य म्हणजे भारतातील दोन तृतियांश लोक इंटरनेट वापरत नाहीत. याची माहिती इंटरनेट ऍड असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) ने आपल्या एका रिपोर्टमध्ये दिली आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की भारतात फक्त 36 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात, जेव्हा की अमेरिका, तुर्की, चीन आणि रशियात ही संख्या क्रमशः 86, 83, 60 आणि 76 टक्के आहे. सांगायचे झाले तर भारतात एकूण इंटरनेट यूजर्सची संख्या 45.1 कोटी एवढी आहे. 

फक्त 33 टक्के स्त्रिया करतात इंटरनेटचा वापर
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की संपूर्ण भारतात फक्त 33 टक्के स्त्रियाच इंटरनेटचा वापर करतात, तसेच रिपोर्टमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की 38 टक्के शहरी स्त्रिया आणि 28 टक्के ग्रामीण स्त्रिया इंटरनेटचा वापर करतात. तसेच पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण देशात 67 टक्के पुरुष इंटरनेटचा वापर करतात, तसेच शहरात यांची संख्या 62 टक्के आणि गावात 72 टक्के आहे.
 
सर्वात जास्त 4जी कनेक्शन
IAMAI ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की भारतात इंटरनेट वापर करणार्‍यांमध्ये सर्वात जास्त अर्थात 86 टक्के लोक 4जी नेटवर्क वाले आहे, जेव्हाकी 13 टक्के लोक 3जी नेटवर्क, 4 टक्के लोक 2जी नेटवर्क आणि 6 टक्के लोक वाय फायच्या माध्यमाने इंटरनेटचा वापर करतात. 

मोबाइल हे सर्वात मोठे शस्त्र आहे
IAMAI चे मानणे आहे की 99 टक्के यूजर मोबाइलवर इंटरनेटचा वापर करतात. तसेच लॅपटॉपवर इंटरनेट वापर करणार्‍यांची संख्या 6 टक्के, डेस्कटॉपवर 4 टक्के आणि टॅबलेटवर फक्त 1 टक्के आहे.