प्लॅन फॉर युवर 31 डिसेंबर....
नवीन वर्ष अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपले असताना नवीन वर्षाच्या स्वागतासाठीचे बेत आखले जाऊ लागले आहेत. यंदा बर्यापैकी थंडीचा मौसम सुरू झाला असल्याकारणाने स्पॉट ठरविण्यासाठी एकच गोंधळ उडाला आहे. नेहमीच्या ठिकाणी जायचं, जवळ कोठेतरी जायचं की अजून कोठे? तर काही जणांना शांत ठिकाणी जायचं आहे. नवीन वर्षाचे जोशात स्वागत आणि सरत्या वर्षाला गुडबाय करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास डेस्टिनेशन्स शोधले आहेत. ही डेस्टिनेशन्स तुममच्या ओळखीची असली तरी यांदाच्या न्यू इयर पार्टीसाठी यांचा विचार करायला हरकत नाही. सो प्लॅन फॉर युवर 31 डिसेंबर....
सापुतारा
निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सापुतारा हे ठिकाण गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर व मुंबई आणि नाशिकपासून अगदी जवळ आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील व गुजरात राज्यातील पर्यटक प्रामुख्याने या ठिकाणी सहलीचा बेत आखतात. डांग जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी वस्ती असल्यामुळे आतापर्यंत पर्यावरणाला कुठलीही झळ पोहोचलेली नाही. त्यामुळे इथलं निसर्गसौंदर्य अबाधित राहिलेले आहे. परंपरा आणि नावीन्यता यांची जपणूक करत इथल्या ोमंडळींनी सापुतारा हा आकर्षक बनवलेला आहे. आधुनिक पर्यटन शैलीत येणार्या गोष्टीदेखील या ठिकाणी आहेत. डोंगराळ रांग, सुंदर सरोवर, डांग जंगल, पूर्णा अभयारण्य, न्याहाळत राहावा असा सूर्योदय आणि सूर्यास्त, त्याच्या सोबतीला नयनरम्य महादेवाचे मंदिर, वस्तुसंग्रहालय, काष्टशिल्पाचे सौंदर्य, वनवाटिका, मिलेनियम गार्डन, पुष्पक रोपवे, हनी सेंटर, रोड गार्डन, फॉरेस्ट नर्सरी, स्वामी नारायण मंदिर, गर्व्हनर हिल, लॉग हट, जैन मंदिर अशा गोष्टी पर्यटकांना भुरळ पाडतात. तिथून जवळच निरा धबधबा, वणीचे मंदिर, हतगड किल्ला, शबरी मंदिर अशी स्थळंदेखील पाहता येतात. पुढे पहा रुपेरी वाळूत-रत्नागिरी..
रुपेरी वाळूत-रत्नागिरी..
रत्नागिरीपासून जवळच रत्नदुर्ग हा किल्ला आहे. याशिवाय दापोलीजवळ सुवर्णदुर्ग आहे. या किल्ल्यावरही दुर्गप्रेमींना फेरफ टका मारता येतो. घोड्याच्या नालीच्या आकाराचा भगवती किल्ला हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला दोन किनारे आहेत. त्यापैकी एका किनार्यावर काळी वाळू तर दुसर्या किनार्यावर पांढरी वाळू दिसते.भगवती मंदिर सुमारे ४00 वर्षांपूर्वीचे आहे. या ठिकाणच्या ३00 फूट उंचीच्या टेकडीलाच गणपती मानण्यात येते. इथल्या समुद्रकिनार्यामुळे हे भाविकांचं आवडतं स्थान आहे. इथून जवळच मालगुंड आहे. प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांचं जन्मस्थान. रत्नागिरीपासून २२ किमीवर आहे पावस. इथं स्वामी स्वरूपानंदांचा आश्रम आहे. अतिशय मोठं पण स्वच्छ असं हे ठिकाण. पावसहून जवळच गणपतीपुळे हे गणेशस्थान आहे. रत्नागिरीहून चिपळूणला जायचं. इथलं परशुरामाचं मंदिर फार प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा घुमट चर्चसारखा आहे, तर गिलावा मुस्लिम पद्धतीचा. दापोली तालुक्यातील हर्णे बंदर निसर्गरम्य म्हणून ओळखलं जातं. हर्णेहून नदी ओलांडली की आंजर्ले गावाला जाता येते. इथला कड्यावरचा गणपती प्रसिद्ध आहे. आंजर्लेचा समुद्रकिनारा, तिथली शांतता ही खास अनुभवण्यासारखी गोष्ट आहे. रत्नागिरीपासून फक्त ३ किमी अंतरावर भाट्ये गाव आहे. अगदी निवांत, गजबजाटापासून दूर. इथला समुद्रकिनाराही अगदी शांत आहे. ज्याला आपण व्हजिर्नबीच म्हणतो असा. या किनार्यावर सुरूच्या झाडांची घनदाट लागवड केल्याने हा भाग 'सुरूचं बन' म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथलं खरं आकर्षण म्हणजे बॅकवॉटर्समधून बोटीनं होणारी दत्तमंदिरापर्यंतची फेरी. आजूबाजूला नारळी-पोफळीच्या बागा, दाट झाडी, किनार्यावरची कौलारू घर आणि त्यातून पाण्याला छेदत जाणारी बोट. दापोली परिसरातील ताडघर-तमासतीर्थ हेही समुद्रावर प्रेम करणार्यांचं आवडतं ठिकाण. तांबडी रेती हे या किनार्यावरचे वैशिष्ट्य. इथला मुरुडकर्देचा समुद्रकिनाराही प्रसिद्ध आहे. कर्दे गाव टिपिकल कोकणातलं, लालमातीतलं, गर्दराईचं. दापोलीहून ५४ किमीवर असलेले केळशी. इथल्या वाळूच्या टेक डीवरून सूर्यास्ताचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. केळशीचा समुद्रकिनारा स्वच्छ, पांढर्या वाळूचा, सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा आहे. एक दिवस किनार्यांवरून फेरफटका मारा, समुद्रात मनसोक्त डुंबा, भिजा. मऊ गार वाळूचा तुमच्या तळपायांना स्पर्श होऊ द्या आणि अनुभवा आयुष्यातील सर्वोच्च सुख.
पुढे पहा केळवे-डहाणू-बोर्डी....
केळवे-डहाणू-बोर्डी