संबंधित माहिती
- फडणवीस यांनी केलेल्या तीन मागण्या अत्यंत महत्त्वाच्या, कारवाई करा
- मात्र यापैकी काही झालं नाही, बाळासाहेब थोरात यांचा फडणवीसांना टोला
- कर्नाटकचे माजी मंत्री म्हणतात, 'फडणवीस माझे गॉडफादर'
- OBC आरक्षण : महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आज अस्वस्थ आहे - देवेंद्र फडणवीस
- देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडेंसह BJP नेते पोलिसांच्या ताब्यात
फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला
"राज्य सरकारने वेळकाढू धोरण न अवलंबता न्या. भोसले यांच्या समितीने सांगितल्याप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत तत्काळ पुढील कारवाई करावी" असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत एक ट्विट केलं आहे.
"पुनर्विचार याचिका दाखल केली तेव्हा आपण हे सांगितलं होतं की, पुनर्विचार याचिकेला फार कमी संधी असते. आपण जर जस्टिस भोसले यांच्या कमिटीने दिलेला निर्णय बघितला तर त्यात हे स्पष्टपणे दिलं आहे की, पुनर्विचार याचिकेला आपल्या काही मर्यादा असतात. त्यांनी स्वत: अनेक अभ्यास आणि संदर्भ देऊन हे सांगितलं आहे की, पुन्हा एकदा मागासवर्गीय आयोगाकडे कशाप्रकारे पाठवलं पाहिजे आणि मागच्या निर्णयात काय त्रुटी आहेत, हे सगळं त्यांनी तयार करुन दिलं आहे. मात्र, सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
