1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
  4. foot care tips in Monsoon

Monsoon Tips: पावसाळ्यात पायांची काळजी घ्या, निष्काळजीपणामुळे संसर्ग होऊ शकतो

असे बरेच लोक आहेत ज्यांना पाऊस आवडतो. या हंगामात संपूर्ण आनंद घेण्यात येतो, परंतु त्यासह येणारे त्रास कमी नाहीत. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचा प्रश्न अनेकदा दिसून येतो. हे भरलेले पाणी पायात संक्रमण तसेच प्रवासामध्ये अडचण आणू शकतं. ओल्या ठिकाणी बुरशी आणि कीटकांचा धोका असतो. याशिवाय जर ओले शूज किंवा मोजे पायांवर राहिले तर संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
 
नखात बराच काळ पाणी भरलेलं राहिलं तर बुरशीचा धोका वाढतो. ज्यामुळे नखात खाज सुटण्यास सुरवात होते. जर याची काळजी घेतली गेली नाही तर ती वाढतच राहते आणि यामुळे बर्‍याच वेळा नखातून रक्त देखील वाहू लागतं.
 
याशिवाय एक्जिमा आणि दादांचा त्रासही होऊ शकतो. एक्जिमा बॅक्टेरियामुळे होतो. यामध्ये पायांवर लाल डाग पडतात आणि खाज सुटण्याबरोबरच त्यात जळनही होते. काळजी घेतली नाही तर त्वचा कडक होते आणि जखमा होण्यास सुरवात होते. आणि दाद एक बुरशीजन्य संसर्ग आहे. या सर्व प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी पायांची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
पावसात भिजल्यानंतर पाय अँटीबायोटिक्सने स्वच्छ करा. बोटांना चांगले स्वच्छ करा. ते चांगले साफ केल्यावर पुसून त्यावर अँटी सेप्टिक क्रीम लावा आणि आपण नखांवर पावडर वापरू शकता. नेहमी आपल्या पायात शूज किंवा चप्पल घाला. तसेच, हे लक्षात ठेवा की जास्त काळ ओले शूज किंवा मोजे घालू नका. पायात संसर्ग झाल्यास नक्कीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुढील लेख
डेरी सारखे दही बनवा घरच्या घरी, सोपी पद्धत अमलात आणा