साहित्य : 3 कप बासमती तांदुळ धुवून निथळलेले, 3/4 कप नारळ खवलेला, 9 हिरव्या मिरच्या, 3/4 कप कोथिंबीर कापलेली, 10 लवंगा, 3 तुकडे दालचिनी, 6 हिरव्या वेलच्या सोललेल्या, 4 कप पाणी, 1/2 तूप, 3 मोठे कांदे उभे चिरलेले, 450 ग्रॅम कोलंबी सोललेली व शिरा काढलेली, 4 छोटे चमचे मीठ, 1 मोठा चमचा सांबार पावडर.
कृती : नारळ, मिरच्या, कोथिंबीर, लवंगा, दालचिनी आणि वेलची यांची पेस्ट करा. एका भांड्यात तूप गरम करून त्यात कांदा घाला आणि गुलाबी होईपर्यंत परता. त्यात पेस्ट घाला. ढळवा आणि साधारण 3 मिनिटे परता कोलंबी, मीठ आणि सांबार पावडर घाला. ढळवा आणि साधारण 3 मिनिटे परता. तांदुळ घालून चांगले मिक्स करून उरलेले पाणी घाला. व 5 मिनिट शिजवा.