कृती- सर्वप्रथम मटन धुऊन पाणी काढून टाकावे. दहीला फेटून त्यात कोथिंबिर, पुदिना व हिरव्या मिरच्या टाकाव्यात. केशर दूधात टाकून तापवून घ्यावे. दह्यात मटण मेरीनेट करावे. कढईत तूप, गरम मसाले, तिखट, मीठ आणि कांदे टाकून 30 मिनिटासाठी ठेऊन द्यावे.
तांदुळ स्वच्छ करून 20 मिनिट भिजवून ठेवावे. एका भांड्यात अर्धा लीटर पाणी उकळत ठेऊन त्यात मीठ, उरलेले गरम मसाले टाकावे. पाणी उकळ्यानंतर त्यात तांदुळ टाकावे. भात तयार झाल्यावर केशर मिश्रित दुधाचा अर्धा भाग मटनावर शिंपडावे. शिजलेल्या भात मटनावर पसरावा. उरलेले केशर मिश्रीत दूध तांदुळावर टाकावे. उरलेल्या तुपाला गरम करून भातावर टाकवे.
भांड्याला मळलेल्या कणकेने सील करून द्यायचे. मग भांड्याला कोळशाच्या शेगडीवर ठेवावे. जेव्हा भांड्याच्या बाजूने वाफ जायला लागेल तेव्हा शेगडीतून कोळशे काढून भांड्यावर ठेवावे. 45 मिनिटापर्यंत ठेवावे. झाकण काढून रायतेसोबत सर्व्ह करावे.