1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. kusumagraj kavita kevhatari mitnyasathi

केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
 
वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती
 
काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते
 
असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे
 
माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही
 
– कुसुमाग्रज
पुढील लेख
महागड्या मेकअप प्रोडक्ट्स या चुकांमुळे खराब होतात, आपणही तर करत नाहीये या चुका