Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवासची चामुंडा आणि तुळजा देवी

Updated: बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (11:40 IST)
येथील पुजारी सांगतात, की या दोन्ही देवी बहिणी आहेत. एकदा दोघींमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झाला. वादाने दुःखी होऊन दोघीजणी आपले स्थान सोडून जायला लागल्या. मोठी देवी पाताळात शिरायला लागली आणि लहान देवी टेकडी सोडून जायला निघाली. संतापलेल्या या दोघींना पाहून त्यांचे साथीदार (असे मानले जाते की हनुमान मातेचा ध्वज घेऊन पुढे आणि भैरूबाबा कवच बनून मागे चालत होते.) हनुमान आणि भैरूबाबाने त्यांचा रांग शांत करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत मोठ्या देवीचे अर्धे शरीर पाताळात गेले होते ती त्याच अवस्थेत टेकडीवर थांबली. लहान देवी टेकडीवरून खाली येत होती आणि रस्ता बंद झाल्याने ती क्रोधित झाली. ज्या अवस्थेत ती खाली उतरत होती त्याच अवस्थेत ती टेकडीवर थांबली.

म्हणून आजही दोन्ही देवी त्याच स्वरूपात येथे आहेत. इथल्या लोकांच्या मते, या दोन्ही देवी स्वयंभू व जागृत आहे. येथे केलेले नवस पूर्ण होतात. देवासबाबत आणखी एक बाब सांगितली जाते. एक म्हणजे देवासमध्य दोन वंश राज्य करीत होते. एक होळकर राजवंश आणि दुसरे म्हणजे पवार वंशाची कुलदेवी.

  WD
टेकडीवर दर्शन करण्यासाठी येणारे भाविक दोन्ही देवींबरोबरच भैरूबाबाचे दर्शन करायला विसरत नाही. नवरात्राच्या वेळी येथे दिवसरात्र लोक येत असतात. या दिवसात येथे मातेची विशेष पूजा करण्यात येते.

पोहचण्याचा मार्ग
हवाई मार्ग - येथून जवळचे विमानतळ म्हणजे मध्य प्रदेशची औद्योगिक राजधानी असलेले इंदूर आहे.
रस्ता मार्ग - हे शहर मुंबई- आग्रा महामार्गाजवळ आहे. हा रस्ता देवीच्या टेकडी जवळूनच जातो. इंदूरपासून देवास 30 किलोमीटरवर आहे. इंदूरहून आपण बस किंवा टॅक्सीने देवासला जाऊ शकतो.
रेल्वे मार्ग - इंदूरहून देवासला रेल्वेद्वारे जाऊ शकता 
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments