Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अपुरे बनलेल्या घरात राहणे म्हणजे वास्तुदोषाला निमंत्रण देणे

Updated: मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (15:32 IST)
अधुरे बनलेल्या घरात राहणे टाळावे      
बर्‍याच वेळा असे होते की एखाद्या शुभ मुहूर्तामुळे आम्ही घाईगडबडीत अपुरे बनलेल्या घरात शिफ्ट होतो. असे केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते. जर नवीन घरात प्लास्टर पूर्ण झाले नसेल, विटा भिंतीतून दिसत असतील किंवा पेंट केले नसेल तर हा एक प्रकारचा वास्तुदोष आहे. त्या घरात नेहमी असंतोष राहतो.

भाड्याच्या घरात ठेवणारी सावधगिरी  
जर तुम्ही भाड्याचे घर घेत असाल तर त्या घरातील भिंती आणि फारश्या तेथे शिफ्ट होण्या अगोदर सुधारून घ्या आणि एकदा पेंट जरूर करवून घ्या. असे केल्याने बर्‍याच मानसिक त्रासांपासून तुमचा बचाव होईल.    

तुटलेल्या टाइल्स देखील नुकसानकारक  
घरात एखादी खोली, किचन किंवा इतर कुठल्या जागेची टाइल्स तुटलेली असेल किंवा फारशांमध्ये भेग पडली असेल तर त्याला लवकर दुरुस्त केले पाहिजे अन्यथा घरात आजारपण येण्याची शक्यता आहे.  

मुख्य द्वार कसे असावे     
घरातील मुख्य द्वार इतर दरांच्या तुलनेत मोठे असायला पाहिजे. मुख्य गेट दोन पल्ल्यांचे असेल तर उत्तम. मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूस खिडक्या नको, नाहीतर घराच्या मालकाला आर्थिक चणचण होण्याची शक्यता असते.

घरात काय ठेवायचे काय नाही   
ज्या घड्याळी बंद असतील त्यांना काढून टाकायला पाहिजे किंवा परत सुरू करून लावायला पाहिजे. तसेच झाड़ूचा वापर केल्यानंतर त्याला अशा प्रकारे ठेवावे की कोणाची नजर त्याच्यावर पडायला नको. अशी मान्यता आहे की याचा सरळ संबंध घरातील धन आणि संपत्तीशी असतो.  

आरशाचा वापर  
आरसा घरातील मुख्य दाराला नाही लावायला पाहिजे. तसेच बाथरूमच्या दारासमोर देखील आरसा नको.  

वातावरण पॉझिटिव्ह असायला पाहिजे 
घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दूर करण्यासाठी चिनी बॉम्बूचा प्रयोग करू शकता. तसेच आपला आणि आपल्या परिवाराच्या सदस्यांचा  भाग्योदय करण्यासाठी घर किंवा व्यापार स्थळाच्या मुख्य दारावर विंड चाइम आणि चिनी नाणे लावणे लाभदायक ठरू शकते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments