suvichar

प्लॉट खरेदी करताना या 10 वास्तू टिप्स लक्षात ठेवा

Updated: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (09:59 IST)
 
4 प्लॉटच्या घरच्या मजल्याचा उतार पूर्वेकडे, उत्तरेकडे किंवा ईशान्य दिशेला असावा. यामध्ये उत्तर दिशा देखील चांगली आहे. वास्तविक, सूर्य हा आपल्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. म्हणून आपल्या वास्तूचे निर्माण सूर्याच्या प्रदक्षिणेला लक्षात घेऊन केल्यानं अधिक योग्य असणार.
 
5 भूखण्डाची निवड देखील एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाला विचारून करावी. म्हणजे जमीन लाल मातीची आहे किंवा पिवळ्या मातीची किंवा काळ्या मातीची किंवा तपकिरी मातीची किंवा दगडी आहे. ओसार, उंदरांच्या बिळाची, वारुळाची, फाटलेली, खडबडीत, खड्ड्यांची, टिळा असलेली जमिनीचा विचार करू नये. ज्या जमिनीवर खणल्यावर राख, कोळसा, हाडे, भुसा बाहेर निघत असल्यास अश्या जमिनीवर घर बांधल्याने आणि वास्तव केल्याने आजार येतात तसेच वय कमी होतं.
 
6 प्लॉटच्या भोवती किंवा जवळपास, बेकायदेशीर कामे असलेले कोणतेही ठिकाण, घर किंवा कारखाने नसावे. जसे की मद्य मांस, मटण, मास्यांची दुकाने इत्यादी गोंधळ आणि गोंगाट करणारे कारखाने, जुगारबाजीची कामे, रेस्टारेंट, अटाळेघर इत्यादी.
 
7 श्मशान घर किंवा वाळवंट असलेल्या जागे जवळ जमीन विकत घेऊ नये.
 
8 जमिनीवर घर बनविण्याचा पूर्वी जमीन चांगल्या प्रकारे स्वच्छ करावी नंतर त्याची शास्त्रोक्त शुद्ध करून त्याची वास्तुपूजा करावी आणि त्यामधल्या पिवळ्या मातीचा वापर करून घर बांधावे. 
 
9 प्लॉट खरेदी करताना जमीन बघून घ्यावी. परीक्षण करून बघावे. जमिनीचे परीक्षण अनेक प्रकारे करतात जसे की खड्डा खणून त्यात पाणी भरून चाचणी केली जाते. 
 
10 जमिनीचा उतार देखील बघावा. पूर्वेकडे आणि उत्तरेकडे आणि ईशान्य दिशेला असलेली जमीन सर्व दृष्टीने फायदेशीर असते. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य आणि मध्यभागी कमी असणारी जमीन 'रोगांचे कारण' म्हणून ओळखली जाते. दक्षिण आणि आग्नेयच्या मध्य उंच जमिनीचे नाव 'रोगकर वास्तू' आहे हे रोगांना उद्भवतात. म्हणून जमिनीची निवड करताना एखाद्या वास्तुतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
 
सूर्यानंतर चंद्राचा प्रभाव या पृथ्वीवर जास्त पडतो. सूर्य आणि चंद्राच्या कक्षानुसारच पृथ्वीचे हवामान चालते. उत्तरी आणि दक्षिणी ध्रुव हे पृथ्वीचे दोनकेंद्रे आहेत. उत्तरी ध्रुव बर्फाने व्यापलेला महासागर आहे. ह्याला आर्कटिक सागर म्हणतात तिथेच दक्षिणी ध्रुव अंटार्क्टिका खंड म्हणून ओळखला जाणारा घन पृथ्वीचा प्रदेश आहे. हे ध्रुव वर्षानुवर्षे फिरतात. 
 
दक्षिणी ध्रुव उत्तरी ध्रुवापेक्षा खूपच थंड आहे. इथे माणसांची वर्दळ नसते. या ध्रुवांच्या मुळे पृथ्वीचे वातावरण कार्यरत होतात. उत्तरेकडून दक्षिणी बाजूस ऊर्जा ओढली जाते. संध्याकाळी जसे जसे पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना दिसतात. म्हणून पूर्व, उत्तर आणि ईशान्य कडे जमिनीचे उतार असायला हवे. 
 
याचा अर्थ असा आहे दक्षिण आणि पश्चिमे दिशेला उत्तर आणि पूर्वीकडील दिशेने उंच असल्यास तिथे राहणाऱ्यांना संपत्ती, यश आणि उत्तम आरोग्य मिळत याचा उलट असल्यास संपत्ती, यश आणि आरोग्याच्या तक्रारींना सामोरी जावे लागते. तथापि, एखाद्या वास्तुतज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. कारण आपल्या घराची दिशा कोणती आहे हे माहीत नसतं. दिशेच्या निर्देशानुसारच उतार घेण्याचा निर्णय घेतला जातो. जर आपल्या जमिनीचा उतार वास्तुनुसार आहे तर निश्चितच ते आपल्याला श्रीमंत करणार. पण वास्तुनुसार नसल्यास ते आपणास गरीब बनवू शकतं.

सर्व पहा

कर्जमुक्तीसाठी मंगळवारी करा 'ऋणमोचक मंगल स्तोत्राचा' पाठ; जाणून घ्या अचूक विधी आणि महत्त्व

मंगळवारी चुकूनही करू नका या गोष्टी; मान्यता काय सांगते?

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

Chaturmas 2026: चातुर्मास कधी सुरू होतो? जाणून घ्या धार्मिक महत्त्व, नियम आणि या काळात काय करावे

Nagpanchami 2026 Date नागपंचमीची पूजा कधी? तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments