ब्रह्मपुत्र नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांपैकी पाच जण बेपत्ता
गुवाहाटीतील ब्रह्मपुत्र नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांपैकी पाच जण बुधवारी बेपत्ता झाले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके स्थानिक अधिकाऱ्यांसोबत तैनात करण्यात आली आहे आणि संयुक्त शोध आणि बचाव कार्य करत आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आसाममधील गुवाहाटी येथील ब्रह्मपुत्र नदीत पोहताना पाच जण बेपत्ता झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना खरघुली येथील भक्ती कुटीर येथे घडली. त्यांनी सांगितले की, बुधवारी आठ जण भरलेल्या नदीत पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी तीन जण पाण्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. इतर पाच जण अजूनही बेपत्ता आहे.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके स्थानिक अधिकाऱ्यांसोबत तैनात करण्यात आली आहेत आणि संयुक्त शोध आणि बचाव कार्य करत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप कोणतेही मृतदेह सापडलेले नाहीत आणि बेपत्ता व्यक्तींची ओळख पटलेली नाही. त्यांनी पुढे सांगितले की, ताज्या माहितीनुसार, बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकांना काम करता यावे यासाठी परिसर सुरक्षित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या भागात ही घटना घडली त्या भागात जोरदार प्रवाह आहेत, ज्यामुळे ऑपरेशन आव्हानात्मक बनत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, वरून पाणी शांत दिसत आहे, परंतु खाली जोरदार प्रवाह आहे.
Edited By- Dhanashri Naik