1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 एप्रिल 2017 (15:51 IST)

मुफ्ती - मोदी भेट काश्मिरवर तोडगा काढा

आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांनी काश्मिर मध्ये काही वाद वगळता शांतता आहे. मात्र अचानक स्थिती हाताबाहेर जाते आणि तेथील सरकारला ते सावरणे अवघड होते. त्यामुळे पुन्हा वाजपेयी सरकारची नीती आपण अवलंब करा अशी मागणी काश्मिर मुख्यमंत्री मह्बुबा मुफ्ती यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
 
जम्मू-काश्‍मिरच्या मुद्यावर काही केल्या तोडगा निघताना दिसत नाही.  केंद्र सरकारही इथल्या राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या भेटीनंतर भाजपचा महबूबा मुफ्ती सरकारला पाठिंबा राहणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र मोदी यांनी घेतलेले कठोर निर्णय बदलतील असे कोणतेही चित्र नाही अथवा देशातील जनतेने मान्य केले आहे. मात्र केंद्र अधिक प्रमाणत काश्मिर प्रश्नावर लक्ष देईल असे समोर येत आहे.