शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (12:46 IST)

Kerala Flood :केरळमध्ये पूरस्थिती, आतापर्यंत नऊ मृत, 20 हून अधिक बेपत्ता, अमित शहा म्हणाले - केंद्र सरकारशक्य सर्व मदत करणार

केरळमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. दक्षिण आणि मध्य केरळमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलनच्या घटना घडल्या आहे. या घटनांमध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि 20 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
केरळमध्ये मुसळधार पाऊस लोकांसाठी घातक ठरला आहे. अनेक शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि 20 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. बचावकार्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पाटणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलप्पुझा, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड आणि वायनाड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
NDRF च्या 11 टीम तैनात
CMO ने सांगितले की NDRF च्या 11 टीम पाटणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि अलप्पुझा जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत  . लष्कराच्या दोन पथकांना तिरुअनंतपुरम आणि कोट्टायममध्ये तैनात करण्यास सांगितले आहे. आपत्कालीन परिस्थितीत हवाई दलाला स्टँडबाय मोडमध्ये राहण्यास सांगितले आहे. त्याच वेळी, एनडीआरएफची एक टीम मुसळधार पावसामुळे प्रभावित एर्नाकुलममधील मुवत्तुपुझा येथे पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केले.
 
केंद्र सरकार सर्व शक्य मदत करेल: अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, केरळच्या काही भागातील परिस्थितीवर सतत मुसळधार पाऊस आणि पूर पाहता नजर ठेवली जात आहे. गरजू लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व करेल. एर्नाकुलम जिल्ह्यातील मुसळधार पावसानंतर केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवत्तुपुझा नदीच्या पाण्याची पातळी वाढली .आज, भारतीय हवामान विभागाने एर्नाकुलम जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. कोट्टायममध्ये बेपत्ता लोकांच्या शोधातगुंतलेल्या
लष्कराने केरळमधील कोट्टायममध्ये बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू केले आहे.
 
बचावकार्यासाठी हवाई दल आणि भारतीय लष्कर तैनात
केरळमधील पूर पाहता भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराने आपले सैन्य तैनात केले आहे. IAF च्या मते, Mi-17 आणि सारंग हेलिकॉप्टर आधीच स्टँडबाय मोडमध्ये आहेत. केरळमधील सध्याची हवामान परिस्थिती पाहता, दक्षिण हवाई कमांड अंतर्गत सर्व ठिकाण हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. 

कोट्टायममध्ये भूस्खलनामुळे 20 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचण्यात अपयशी ठरले. हवामान विभागाने राज्याच्या इतर भागातही पावसाचा अंदाज वर्तवला आहे.पावसाळा बघता त्रावणकोर देवस्वोम मंदिराच्या बोर्डाने अय्यप्पाच्या भाविकांना रविवार आणि सोमवारी पाटणमथिट्टा जिल्ह्यातील सबरीमाला मंदिर जाऊ नये असे सांगण्यात आले आहे.