गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (11:47 IST)

लग्नानंतर काही मिनिटांतच नववधू झाली विधवा, सासरी पोहोचताच नवर्‍याला आला हार्ट अटॅक

बेतिया- बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका कुटुंबाने आपल्या मुलीला मोठ्या प्रेमाने निरोप दिला होता, मात्र लग्नानंतर काही तासांतच वराचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच दोन्ही कुटुंबात खळबळ उडाली. काही वेळापूर्वी लग्नाचे सनई वाजत असतानाच शोककळा पसरली. असे सांगितले जात आहे की लग्नानंतर वधूसह मिरवणूक तिच्या घरी पोहोचताच वराला अचानक चक्कर आली आणि त्याचा मृत्यू झाला. सोळा श्रृंगारांनी सजलेली वधू काही क्षणातच विधवा झाली. या दुःखद घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
 
साठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरडवली बसंतपूर गावातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चरडवली गावातील चंदेश्वर गिरी यांचा एकुलता एक मुलगा मनीष गिरी याचे लग्न योगपट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील अमेठिया गावातील चंदासोबत निश्चित झाले होते. सोमवारी मनीष मिरवणूक घेऊन अमेठिया गावात आला. वधू-वरांचे लग्न थाटामाटात पार पडले. पण लग्नाआधी वर मनीषला चक्कर येऊ लागली, त्यानंतर उपस्थित लोकांनी औषध दिले आणि त्याची तब्येत बरी झाली.
 
रात्री उशिरा तीन वाजण्याच्या सुमारास लग्नाचे सर्व विधी उरकून आनंदाने घरातून चंदाची डोली उठली. पहाटे पाचच्या सुमारास मनीष वधूसोबत त्यांच्या घरी पोहोचला. वधूला गाडीतून उतरवण्याचा विधी करत असतानाच वधू-वर गाडीतून उतरून घराकडे निघाले असता मनीषला पुन्हा चक्कर आल्याने तो तिथेच पडला. घाईघाईत घरातील लोकांनी मनीषला जीएमसीएचमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
मनीषचा अचानक मृत्यू कसा झाला याबाबत काहीही कळू शकले नाही. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. लग्नानंतर अवघ्या काही तासांतच वराचा मृत्यू झाल्याने कुटुंबात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर परिसरातील नागरिकही हैराण आणि अस्वस्थ झाले आहेत.
 
मनीष हा त्याच्या घरात एकमेव दिवा होता. तो एका पायाने असहाय्य होता, त्यामुळे त्याला काहीच करता येत नव्हते. पण त्याच्या लग्नाबद्दल त्याच्या आई-वडिलांची अनेक स्वप्ने होती, जी क्षणार्धात भंग पावली. मृतदेह घेऊन नातेवाईक घरी गेले आहेत. त्याचवेळी काही तासांपूर्वी नववधू झालेल्या चंदाची अवस्थाही बिकट आहे.