संबंधित माहिती
- अयोध्येत खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या अर्थसहाय्येसाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही
- राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजारांची मदत
- श्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती
- वसंतदादा साखर कारखाना बनवतो ‘सॅनिटायझर’
राम मंदिर उभारणीचे काम तुर्त थांबविले
सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारणीचं काम तुर्तास थांबवण्यात येणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे आणि देशाचे संरक्षण करणे ही सर्वात महत्त्वाचं आहे, असं राम मंदिर ट्रस्टनं म्हटलं आहे.
राम मंदिर प्रश्नी मागील वर्षी न्यायालयाकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, राम मंदिर ट्रस्टनं भारत चीन सीमेवरील तणावाबाबत चिंता व्यक्त केली. तसंच नव्या तारखेचीही घोषणा करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती दिली. “मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय देशातील परिस्थितीनुसार घेतला जाईल आणि अधिकृतपणे जाहीर केला जाईल,” अशी माहिती ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी पीटीआयशी बोलताना दिली. दरम्यान, यावेळी राम मंदिर ट्रस्टकडून जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.