शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 मे 2021 (22:26 IST)

खबरदारी घेतल्यावर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही -वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन

The third wave of corona will not come if caution is taken - Scientific advisor K. Vijay Raghavan
नवी दिल्ली. कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने, नरेंद्र मोदी सरकारचे केंद्राचे वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवनशुक्रवारी म्हणाले की, खबरदारी घेतली गेली आणि तसेच साथीच्या विरुद्ध कठोर पावले देखील उचलले गेले तर साथीच्या आजाराची तिसरी लाट उद्भवणार नाही. 
राघवन म्हणाले की, कठोर पावले उचलले गेले तर कुठेही कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. ते म्हणाले की ,कोरोना मार्गदर्शक तत्त्वे राज्य, जिल्हा व स्थानिक पातळीवर शक्य तितक्या प्रभावीपणे अंमलात आणल्या गेल्या तर तिसर्‍या लहरीतील आशंका देखील दूर होतील.
उल्लेखनीय आहे की यापूर्वी बुधवारी राघवन यांनी तिसर्‍या लाटेचा इशारा दिला होता. ते म्हणाले की तिसरी लहर नक्कीच येईल. तथापि, ते असेही म्हणाले की संसर्गाची अनेक प्रकरणे येत आहेत, त्यामुळे तिसरी लहर कधी येईल हे सांगता येत नाही.
ते म्हणाले की ही लससुद्धा अपडेट करणे आवश्यक आहे जेणेकरुन या नवीन कोरोना स्ट्रेनचा सामना करणे शक्य असेल. राघवन म्हणाले की, तिसऱ्या लाटेची तयारी सुरु करायला हवी.