बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (14:59 IST)

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शिंदे सरकार ठोस पावले उचलण्यात अपयशी

sharad panwar
महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र राज्याचे एकनाथ शिंदे-भाजप सरकार त्यांच्या मदतीसाठी ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 
 
शरद पवार यांनी पुण्यातील त्यांच्या गृहजिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्या तक्रारी ऐकून घेतल्या. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार ठोस उपाययोजना करण्यास तयार नसल्याची खंत माजी केंद्रीय मंत्र्यांनी पुरंद तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. पुण्यात ऑक्टोबरमध्ये विलक्षण मुसळधार पाऊस झाला.
 
राष्ट्रवादीच्या नेत्याने शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दर्शवली. शेतकर्‍यांना आश्वासन दिले की त्यांना त्यांची दुर्दशा समजली असून शक्य ते प्रयत्न केले जातील. पवार म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने काही ठोस पावले उचलायला हवीत. पण सध्याचे सरकार अशा उपाययोजना करायला तयार नाही. केंद्रालाही परिस्थितीची माहिती दिली होती, मात्र ठोस निर्णय झाला नाही.