मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (09:50 IST)

एनसीबी'च्या कारवायांबाबत मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधानांना पत्र- नवाब मलिक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोवर (एनसीबी) होणारे आरोप, या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणारा पदाचा दुरुपयोग आदी तक्रारींबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधणार असल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी (26 ऑक्टोबर) सांगितलं.

समीर वानखेडे यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची विशेष चौकशी पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मलिक यांनी करतानाच एनसीबीवर गंभीर आरोप केले.

"मुंबईतील चित्रपट उद्योग हा हॉलीवूडनंतरचा जगातला एक मोठा उद्योग आहे. लाखो लोकांचा त्यावर रोजगार आहे. देशाच्या जीडीपीमध्ये तीन-चार टक्के वाटा आहे. जर या पद्धतीने या उद्योगाला बदनाम केले तर त्याचा परिणाम काही अभिनेत्यांवरच होईल असं नाही, तर लाखो लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. ते लाखो लोक अडचणीत येतील," याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिंता व्यक्त केल्याचं मलिक यांनी सांगितलं.